शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणार

By admin | Updated: August 28, 2016 23:57 IST

खंडेराव धरणे : बंदीसाठी हालचाली सुरू; वाई येथील बैठकीत गणेशोत्सव मंडळांना विविध सूचना

वाई : ‘शासनाच्या धोरणानुसार गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम डॉल्बीसाठी आवाजाची मर्यादा आसणार आहे़ मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर व डॉल्बी मालकांवर कायदेशीर कार्यवाही करून दंड आकरण्यात येणार आहे़ डॉल्बी जिल्हा बंदी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत,’ अशी माहिती पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे यांनी दिली. वाई येथील यात्री निवास व कन्या शाळेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सव शांततेत व्हावा, कोणी नियमांचे उल्लघन करू नये, मंडळांना विविध प्रकारच्या सूचना देणे व त्यांची मते जाणून घेण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था व गणेश मंडळांसाठी ही बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, नगराध्यक्षा सीमा नायकवडी, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, मुख्याधिकारी आशा राऊत, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, नगसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे, डॉ़ अमर जमदाडे, पद्मा पिसाळ, शर्मिला जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ पोलिस उपअधीक्षक धरणे म्हणाले, ‘मंडळांना यावर्षी शासनाकडून शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत देखावे सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे़ मंडळाच्या मंडपाचा आकार नियमानुसार असावा. आक्षेपार्ह देखावे न दाखविता समाज प्रबोधनाचे देखावे सादर करावेत़ धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसणाऱ्या मंडळांना वर्गणी गोळा करता येणार नाही. तशा आशयाची तक्रार आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणार आहे. गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. (प्रतिनिधी) समाजाचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने राज्य पातळीवर लोकमान्य टिळक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात बक्षीस व सन्मानपत्र मिळणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या विषयांची माहिती घेऊन देखावे करून या स्पर्धेत भाग घ्यावा. - अस्मिता मोरे, प्रांताधिकारी डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम असून, ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते़ शहरातील मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सवाचे पावित्र्य जपावे. शहरातून डॉल्बी हद्दपार करून एक नवा आदर्श घालून द्यावा. - विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक वाई पावसामुळे कृष्णा नदी स्वच्छ झाली असून, तिची स्वच्छता कायमस्वरूपी राखणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने शाडूच्याच मूर्ती घ्याव्यात़ वाई शहरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे़ - आनंद पटवर्धन, संचालक समूह संस्था