शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विनापास घरपोच सेवा दिल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:41 IST

कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या किराणा व भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवण्यात आली ...

कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या किराणा व भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, विक्रेत्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यासाठीही परवानगीची आवश्यकता आहे. मात्र, कऱ्हाडात पालिकेची परवानगी न घेता घरपोच भाजी विकताना आठ विक्रेते आढळून आले. पालिका कर्मचा-यांनी संबंधित विक्रेत्यांकडील भाजीपाला जप्त केला. पालिकेने आजअखेर ८० भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी केली आहे. त्यामध्ये चार जण बाधित आढळले आहेत. यापूर्वी किराणा दुकानदारांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्येही काही जण बाधित आढळले. त्यामुळे किराणा व भाजीपाला घरपोच विक्री करण्यापूर्वी विक्रेत्यासह त्याच्याकडे असलेल्या कामगाराची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चाचणी निगेटिव्ह प्राप्त झाली तरच संबंधिताला घरपोच विक्री सेवेसाठी आवश्यक असणारा पास मिळणार आहे. मात्र, काही जण चाचणी न करता आणि पास न घेता किराणा तसेच भाजीपाला घरपोच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पालिकेने याबाबत कठोर भूमिका घेतली असून चाचणी न करता आणि पास न घेता कोणी घरपोच विक्री करीत असेल तर संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही विक्रेत्याकडे पालिकेचा पास असल्याशिवाय भाजी तसेच किराणा घेऊ नये, असे आवाहनही पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.