शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वाईत विनाकारण फिरणाऱ्या १६५ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

वाई : प्रशासनाने १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी ...

वाई : प्रशासनाने १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी व चारचाकी धारकांवर धडक कारवाई करत आहेत. १६५ हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करून ५५ हजारांहून अधिक दंड वसूल करून ६३ वाहने जप्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर व नागरिकांवर धडक कारवाई केली जात असून, नागरिकांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करणार, असा इशारा वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात हाहाकार माजविला असल्याने शासनाची व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी वाई शहरातील चौका-चौकात, रस्त्यावर नागरिक अनावश्यक आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन विनाकरण फिरत असताना आढळून आल्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी किसनवीर चौक, एसटी स्टँड परिसर, महागणपती चौक, भाजी मंडई सह्याद्रीनगर नाका आदी ठिकाणी धडक कारवाई केली. ही कारवाई सात दिवस चालू आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी कारवाईत भाग घेतला. अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसल्यावर कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

सध्या वाई शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कोरोनोबाधित रुग्णांची वाढत असून, नियमांचे पालन न केल्यास गंभीर परिस्थिती होऊन प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण फिरत आहेत, तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. महसूल, पोलीस, आरोग्य विभाग नगरपालिका, ग्रामपंचायती प्रशासन असे सर्वजण रात्रंदिवस वाई शहरासह तालुक्यातील गावांंमध्ये कोरोनाशी लढा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू असतानाही काही नागरिक कायद्यांचे उल्लंघन करून दुचाकीवरून विनाकारण पोलिसांच्या समोरून ये-जा करीत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन जरी रस्त्यावर त्यांचे काम प्रामाणिक करत असले, तरी या आवश्यक कामाला नागरिकांची साथ आवश्यक आहे. तरी नागरिकांनी कोरोनोसारख्या रोगावर मात करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोट..

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नियम न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरात विनाकारण, विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चालू असून, नागरिकांनी नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल.

- आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस स्टेशन