शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

वाईत विनाकारण फिरणाऱ्या १६५ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

वाई : प्रशासनाने १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी ...

वाई : प्रशासनाने १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला असून, शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिक, दुचाकी व चारचाकी धारकांवर धडक कारवाई करत आहेत. १६५ हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करून ५५ हजारांहून अधिक दंड वसूल करून ६३ वाहने जप्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर व नागरिकांवर धडक कारवाई केली जात असून, नागरिकांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करणार, असा इशारा वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात हाहाकार माजविला असल्याने शासनाची व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी वाई शहरातील चौका-चौकात, रस्त्यावर नागरिक अनावश्यक आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन विनाकरण फिरत असताना आढळून आल्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी किसनवीर चौक, एसटी स्टँड परिसर, महागणपती चौक, भाजी मंडई सह्याद्रीनगर नाका आदी ठिकाणी धडक कारवाई केली. ही कारवाई सात दिवस चालू आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी कारवाईत भाग घेतला. अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसल्यावर कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

सध्या वाई शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कोरोनोबाधित रुग्णांची वाढत असून, नियमांचे पालन न केल्यास गंभीर परिस्थिती होऊन प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण फिरत आहेत, तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. महसूल, पोलीस, आरोग्य विभाग नगरपालिका, ग्रामपंचायती प्रशासन असे सर्वजण रात्रंदिवस वाई शहरासह तालुक्यातील गावांंमध्ये कोरोनाशी लढा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू असतानाही काही नागरिक कायद्यांचे उल्लंघन करून दुचाकीवरून विनाकारण पोलिसांच्या समोरून ये-जा करीत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन जरी रस्त्यावर त्यांचे काम प्रामाणिक करत असले, तरी या आवश्यक कामाला नागरिकांची साथ आवश्यक आहे. तरी नागरिकांनी कोरोनोसारख्या रोगावर मात करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोट..

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नियम न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरात विनाकारण, विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चालू असून, नागरिकांनी नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल.

- आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस स्टेशन