शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावरच्या पांगाऱ्यात साकारतोय ‘रक्तात रंगला चुडा’

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

सलग २५ वर्षे नाटक : श्री केदारनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

परळी : परळी खोऱ्यातील ठोसेघर पठारावर डोंगरावर वसलेल्या पांगारे गावातील देवतानाट्य मंडळ गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा जोपासत आहे. यावर्षी श्री केदारनाथ यात्रा सोहळा निमित्ताने ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे तीन अंकी नाटक बसविले आहे. हे नाटक मंगळवार (दि. ३१) मार्च रोजी सादर होणार असून, नाटक पाहण्यासाठी गावासह परळी पंचक्रोशीतील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आजही दुर्गम, डोंगराळ असणाऱ्या भागात नाटक कला जिवंत ठेवण्याचे काम हे मंडळ करीत आहेत.साताऱ्यापासून २५ किलोमीटर असलेल्या ठोसेघर पठारावरील पांगारे या छोट्याशा गावात गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा चालू आहे. मंगळवारी श्री केदारनाथ यात्रा सोहळा होणार आहे. या यात्रेनिमित्त येथील देवतानाट्य मंडळ यांच्या आश्रयाखाली श्री समर्थ मित्र मंडळाने तुफान विनोदी, लावण्यांनी परिपूर्ण नटलेले असे तीन अंकी नाटक ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे नाटक होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक, रात्री नऊ वाजता छबिना सोहळा, रात्री ११ वाजता पांगारे गावासह परिसरातील ढोल-लेझीम पथकांचे कार्यक्रम होणार आहेत.तसेच गावचे ग्रामदैवत असणाऱ्या केदारनाथ नवीन मंदिराच्या जीर्णोद्धरावेळी कार्यक्रमाची क्षणचित्रे पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. बुधवार, दि. १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विजय आकलेकरसह बेबी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा, मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी चार वाजता परिसरातील नामांकित पैलवानांच्या जंगी कुस्त्या होणार आहेत.या मंडळानी यापूर्वी अनेक नाटके केली. यातील काही नाटके मुंबई येथे सभागृहात झाली आहेत. यामध्ये ‘रक्तात रंगला गाव, सख्खा भाऊ पक्का वैरी,’ महाराष्ट्राचा बहुरूपी, देखणी बायको दुसऱ्याची व यळकोट-यळकोट जयमल्हार अशी अनेक नाटके या मंडळाने सादर केली आहेत. यामुळेच या मंडळाची नाटके पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गर्दी होत असते. (वार्ताहर)नाटकात तरुण वर्गाचा सहभागगावोगावी राजकारणाची निवडणुकीचा फिव्हर वाढत चालला आहे. ग्रामपंचायत निवडणूकही तोंडावर येऊन ठेपली आहे. भावकी-भावकीत राजकारण तापले आहे. परंतु या मंडळाने नाटक बसून गाव एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. तर या नाटकात सर्व तरुणवर्ग असून, सर्वजण तीस वर्षे वयोगटाच्या आतीलच आहेत. त्यामुळे या नाटकाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.१९५७ मध्ये आमच्या देवतानाट्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर हे सलग २५ वे नाटक आहे. मी प्रथमच नाटकांमध्ये काम करीत आहे. मला काम करताना थोडी भीती वाटत असून, यातील मुख्य पात्र हे माझे असल्याने मला जास्तीत जास्त भीती वाटत आहे. परंतु नाट्य मंडळाने जे पात्र मला दिली आहे. ते मी व्यवस्थित पार पाडेन.-दीपक जाधव, कलाकार, पांगारे