शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

डोंगरावरच्या पांगाऱ्यात साकारतोय ‘रक्तात रंगला चुडा’

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

सलग २५ वर्षे नाटक : श्री केदारनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

परळी : परळी खोऱ्यातील ठोसेघर पठारावर डोंगरावर वसलेल्या पांगारे गावातील देवतानाट्य मंडळ गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा जोपासत आहे. यावर्षी श्री केदारनाथ यात्रा सोहळा निमित्ताने ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे तीन अंकी नाटक बसविले आहे. हे नाटक मंगळवार (दि. ३१) मार्च रोजी सादर होणार असून, नाटक पाहण्यासाठी गावासह परळी पंचक्रोशीतील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आजही दुर्गम, डोंगराळ असणाऱ्या भागात नाटक कला जिवंत ठेवण्याचे काम हे मंडळ करीत आहेत.साताऱ्यापासून २५ किलोमीटर असलेल्या ठोसेघर पठारावरील पांगारे या छोट्याशा गावात गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा चालू आहे. मंगळवारी श्री केदारनाथ यात्रा सोहळा होणार आहे. या यात्रेनिमित्त येथील देवतानाट्य मंडळ यांच्या आश्रयाखाली श्री समर्थ मित्र मंडळाने तुफान विनोदी, लावण्यांनी परिपूर्ण नटलेले असे तीन अंकी नाटक ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे नाटक होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक, रात्री नऊ वाजता छबिना सोहळा, रात्री ११ वाजता पांगारे गावासह परिसरातील ढोल-लेझीम पथकांचे कार्यक्रम होणार आहेत.तसेच गावचे ग्रामदैवत असणाऱ्या केदारनाथ नवीन मंदिराच्या जीर्णोद्धरावेळी कार्यक्रमाची क्षणचित्रे पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. बुधवार, दि. १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विजय आकलेकरसह बेबी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा, मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी चार वाजता परिसरातील नामांकित पैलवानांच्या जंगी कुस्त्या होणार आहेत.या मंडळानी यापूर्वी अनेक नाटके केली. यातील काही नाटके मुंबई येथे सभागृहात झाली आहेत. यामध्ये ‘रक्तात रंगला गाव, सख्खा भाऊ पक्का वैरी,’ महाराष्ट्राचा बहुरूपी, देखणी बायको दुसऱ्याची व यळकोट-यळकोट जयमल्हार अशी अनेक नाटके या मंडळाने सादर केली आहेत. यामुळेच या मंडळाची नाटके पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गर्दी होत असते. (वार्ताहर)नाटकात तरुण वर्गाचा सहभागगावोगावी राजकारणाची निवडणुकीचा फिव्हर वाढत चालला आहे. ग्रामपंचायत निवडणूकही तोंडावर येऊन ठेपली आहे. भावकी-भावकीत राजकारण तापले आहे. परंतु या मंडळाने नाटक बसून गाव एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. तर या नाटकात सर्व तरुणवर्ग असून, सर्वजण तीस वर्षे वयोगटाच्या आतीलच आहेत. त्यामुळे या नाटकाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.१९५७ मध्ये आमच्या देवतानाट्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर हे सलग २५ वे नाटक आहे. मी प्रथमच नाटकांमध्ये काम करीत आहे. मला काम करताना थोडी भीती वाटत असून, यातील मुख्य पात्र हे माझे असल्याने मला जास्तीत जास्त भीती वाटत आहे. परंतु नाट्य मंडळाने जे पात्र मला दिली आहे. ते मी व्यवस्थित पार पाडेन.-दीपक जाधव, कलाकार, पांगारे