शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावरच्या पांगाऱ्यात साकारतोय ‘रक्तात रंगला चुडा’

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

सलग २५ वर्षे नाटक : श्री केदारनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

परळी : परळी खोऱ्यातील ठोसेघर पठारावर डोंगरावर वसलेल्या पांगारे गावातील देवतानाट्य मंडळ गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा जोपासत आहे. यावर्षी श्री केदारनाथ यात्रा सोहळा निमित्ताने ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे तीन अंकी नाटक बसविले आहे. हे नाटक मंगळवार (दि. ३१) मार्च रोजी सादर होणार असून, नाटक पाहण्यासाठी गावासह परळी पंचक्रोशीतील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आजही दुर्गम, डोंगराळ असणाऱ्या भागात नाटक कला जिवंत ठेवण्याचे काम हे मंडळ करीत आहेत.साताऱ्यापासून २५ किलोमीटर असलेल्या ठोसेघर पठारावरील पांगारे या छोट्याशा गावात गेल्या २५ वर्षांपासून नाटक बसविण्याची परंपरा चालू आहे. मंगळवारी श्री केदारनाथ यात्रा सोहळा होणार आहे. या यात्रेनिमित्त येथील देवतानाट्य मंडळ यांच्या आश्रयाखाली श्री समर्थ मित्र मंडळाने तुफान विनोदी, लावण्यांनी परिपूर्ण नटलेले असे तीन अंकी नाटक ‘सुडाचा विडा रक्तात रंगला चुडा’ हे नाटक होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक, रात्री नऊ वाजता छबिना सोहळा, रात्री ११ वाजता पांगारे गावासह परिसरातील ढोल-लेझीम पथकांचे कार्यक्रम होणार आहेत.तसेच गावचे ग्रामदैवत असणाऱ्या केदारनाथ नवीन मंदिराच्या जीर्णोद्धरावेळी कार्यक्रमाची क्षणचित्रे पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. बुधवार, दि. १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विजय आकलेकरसह बेबी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा, मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी चार वाजता परिसरातील नामांकित पैलवानांच्या जंगी कुस्त्या होणार आहेत.या मंडळानी यापूर्वी अनेक नाटके केली. यातील काही नाटके मुंबई येथे सभागृहात झाली आहेत. यामध्ये ‘रक्तात रंगला गाव, सख्खा भाऊ पक्का वैरी,’ महाराष्ट्राचा बहुरूपी, देखणी बायको दुसऱ्याची व यळकोट-यळकोट जयमल्हार अशी अनेक नाटके या मंडळाने सादर केली आहेत. यामुळेच या मंडळाची नाटके पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ गर्दी होत असते. (वार्ताहर)नाटकात तरुण वर्गाचा सहभागगावोगावी राजकारणाची निवडणुकीचा फिव्हर वाढत चालला आहे. ग्रामपंचायत निवडणूकही तोंडावर येऊन ठेपली आहे. भावकी-भावकीत राजकारण तापले आहे. परंतु या मंडळाने नाटक बसून गाव एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. तर या नाटकात सर्व तरुणवर्ग असून, सर्वजण तीस वर्षे वयोगटाच्या आतीलच आहेत. त्यामुळे या नाटकाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.१९५७ मध्ये आमच्या देवतानाट्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर हे सलग २५ वे नाटक आहे. मी प्रथमच नाटकांमध्ये काम करीत आहे. मला काम करताना थोडी भीती वाटत असून, यातील मुख्य पात्र हे माझे असल्याने मला जास्तीत जास्त भीती वाटत आहे. परंतु नाट्य मंडळाने जे पात्र मला दिली आहे. ते मी व्यवस्थित पार पाडेन.-दीपक जाधव, कलाकार, पांगारे