शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारपीडित मुलीशी लावले आरोपीचे लग्न !

By admin | Updated: March 19, 2015 00:11 IST

पोलिसांचा पुढाकार : युवक बेपत्ता; 'तिची' बाळासह फरफट : नातेवाईकांचा आरोप

सातारा : अवघ्या सतराव्या वर्षी अत्याचारामधून जन्माला आलेल्या बाळासह ‘तिची’ फरफट सुरू आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असताना औंध पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून न घेता उलट तिचे संबंधित तरुणाबरोबर लग्न लावण्यात पुढाकार घेतला, असा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला आहे. लग्नादिवशीच पसार झालेला अत्याचारी युवक अद्याप फरारी असून, ‘मनोधैर्य’ योजनेतून एक पैसाही मदत न मिळाल्याने मुलीची अवस्था केविलवाणी झाली आहे.आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत घरात जन्मलेल्या या मुलीचे आई-वडील शेतमजूर आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच ती गर्भवती राहिल्याचे समजल्याने आई-वडील खचले. अत्याचारातून हा प्रकार घडल्याचे मुलीने सांगताच आरोपी धनाजी लालासाहेब पाटोळे या तरुणाला सोबत घेऊन ते औंध पोलीस ठाण्यात गेले. परंतु पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून घेतला गेला नाही. उलट, पाटोळे संबंधित मुलीशी लग्न करण्यास तयार आहे, असे सांगून पोलिसांनीच हे लग्न जुळवून आणले, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी पत्रकारांशी बोलताना केला.अत्यंत कठीण परिस्थितीत या कुटुंबाने सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्याकडे धाव घेतली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पाटोळे फरारी झाल्यानंतर पाच दिवसांनी २१ डिसेंबर रोजी त्यांनी औंध पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिला-बालकल्याण विभागात ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत मदतीसाठी अर्जही केला. तथापि, नुकत्याच झालेल्या या विभागाच्या बैठकीत जिल्ह्यातील २२ पैकी एकही प्रकरण मंजूर झाले नाही.संबंधित मुलीला मुलगी झाली असून, ती आता दोन महिन्यांची आहे. अत्याचारप्रकरणी आरोपीस तातडीने पकडावे आणि ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत मदत मंजूर व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी आणि राज्य महिला लोक आयोग या संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)‘पाचगणी’चे आरोपपत्र न घेण्याचे आवाहन पाचगणीत अडीच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा राज्य महिला लोक आयोग संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला असून, आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी जिल्हा सरकारी वकिलांना अर्ज केला आहे. तसेच अत्यंत चीड आणणाऱ्या या प्रकरणात सामाजिक बांधिलकी म्हणून आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, असे आवाहन वकिलांना केले आहे.संबंधित अल्पवयीन मुलीच्या लग्नाशी पोलिसांचा काहीही संबंध नाही. पोलीस ठाण्यात अत्याचाराचाच गुन्हा दाखल झाला असून, त्यानुसारच तपास सुरू आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल.- उदय देसाई,सहायक पोलीसनिरीक्षक, औंध