शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

बटाटा बियाण्याचे व्यापारी एकवटले

By admin | Updated: November 28, 2014 23:53 IST

आरोप बिनबुडाचे : पुसेगाव बाजारपेठेला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध दावा ठोकणार

पुसेगाव: पश्चिम महाराष्ट्रातील खेड-मंचरनंतर बटाटा बियाणे खरेदी व विक्रीसाठी पुुसेगाव बाजारपेठेचे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याबाबत हेतुपुरस्सर केलेल्या आरोपांमुळे बाजारपेठेचे नाव बदनाम होणार असल्याने व्यापारी संघटनेच्या झेंड्याखाली गावातील व्यापारी एकवटले आहेत.पुसेगावच्या बाजारपेठेत सांगली, खानापूर विटा, तासगाव, आटपाडे, सांगोला, अकलूज, फलटण तसेच सातारा व कोरेगाव भागातील शेतकरी विश्वासाने बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी येतात. परंतु दरम्यान, ‘मी स्वत: शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतकऱ्यांविषयी कळवळा व सहानुभूती असून, माझ्याकडे शेतीमाल खरेदी-विक्रीचा परवानाही नाही. पुसेगावसारख्या नावाजलेल्या बाजारपेठेत मी कुणालाही बटाट्याचे बोगस बियाणे विकलेले नाही. केवळ पूर्वग्रहदूषित वृत्तीने मला व बाजारपेठेला बदनाम करण्याचा हा कुटील डाव काही शेतकऱ्यांनी रचला आहे,’ असे जाधव ट्रेडिंग कंपनीचे मालक वैभव जाधव यांनी म्हटले आहे. ‘संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडून बटाटा बियाणे खरेदी केले असल्यास ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे; अन्यथा मला व पुसेगाव बाजारपेठेला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.पुसेगाव, ता. खटाव येथील बटाटा बाजारपेठेतून खरीप हंगामात बटाट्याचे बोगस बियाणे विकल्याची तक्रार काटकरवाडी येथील वसंतराव निकम यांनी यांनी पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २६) संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने निकम यांच्या शेतात बटाटा झाडे उपटून पाहणी केली व बियाणे बोगस असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्यांचा व आपला काहीही संबंंध नसून, त्यांनी आपल्याकडून बटाटा बियाणे खरेदी केलेलेच नाही, असा दावा वैभव जाधव यांनी केला आहे. (प्रतिनिधी)खराब हवामानाचा फटकायावर्षी बटाटा पिकाला पोषक हवामान असले तरी या भागात पडणाऱ्या सततच्या पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी कित्येक दिवस वाहत होते. त्यामुळे खराब हवामान, पाऊस याचा फटका बटाटा पिकाला बसला आहे. केवळ एखाद्याला नजरेसमोर ठेवून बेताल आरोप केल्याने जिल्ह्यासह इतर भागातील शेतकऱ्यांचा पुसेगाव बाजारपेठेवरचा विश्वास उडणार आहे. केवळ द्वेषापोटी एखाद्याला नाहक बदनाम करण्याचा हा प्रकार थांबणे गरजेचे आहे, असे बियाण्यांचे व्यापारी संतोष तारळकर यांनी म्हटले आहे. पुसेगाव बाजारपेठेतून बोगस बटाटा बियाणे विकले गेल्याच्या आरोपामुळे बाजारपेठेचे नाव बदनाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी गावातील व्यापारी संघटना वैभव जाधव यांच्या पाठीशी आहे. - प्रकाश नांगरे, बटाटा बियाणे व्यापारी