शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘वाडी’ नावामुळे म्हणे, ‘शुभमंगल’ अडतंय!

By admin | Updated: February 15, 2015 00:58 IST

पुरोगामी साताऱ्यावर परंपरेचा पगडा : जिल्ह्यात ३९१ वाड्या; पाटण तालुक्यात सर्वाधिक तर जावळी, खंडाळ्यात संख्या कमी

संजय पाटील ल्ल कऱ्हाड जिल्हा परिषदेकडे गावांच्या नाव बदलाचे सध्या सहा प्रस्ताव धूळखात पडलेत. संबंधित गावांची नावे बदलण्यासाठीची वेगवेगळी कारणे आहेत; पण ‘अडलेलं शुभमंगल’ हे सर्वांचेच मुख्य कारण आहे. गावाच्या नावात ‘वाडी’ असल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविण्यात अडचणी येत असल्याचं बहुतांश गावांचं म्हणणं आहे. तसेच ‘वाडी’ म्हणताच सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असेही काही ग्रामस्थ सांगतायत. वाई तालुक्यातील ‘चोराचीवाडी’ या महसुली गावाचा काही दिवसांपूर्वीच नावबदल झाला. चोराचीवाडी ‘आनंदपूर’ बनलं. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्यातील ज्या-ज्या गावांनी नाव बदलाचे प्रस्ताव पाठविले त्यांच्या आशाही पल्लवित झाल्या. जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करताना संबंधित गावांनी नाव बदलाची वेगवेगळी कारणे दिली आहेत. मात्र, ज्यावेळी ‘लोकमत’ने नाव बदलामागील कारणांचा शोध घेतला, त्यावेळी ‘खासगी’तील अन्य काही कारणं समोर आली. ‘वाडी’शी सोयरिक करण्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे बहुतांश वाड्यांना नाव बदलायचंय, हे मुख्य कारण सध्या समोर येत आहे. जिल्ह्यात जावळी तालुक्यात १६, कऱ्हाड तालुक्यात ५८, खंडाळा १६, खटाव ४४, कोरेगाव ५०, माण २०, पाटण ७४, फलटण ४१, सातारा ५० व वाई तालुक्यात २२ वाड्या आहेत. या गावांच्या नावात ‘वाडी’ असल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविताना त्यांच्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘वाडी’ असल्यामुळेच मुला-मुलींना नकार दिला जातो. मुला-मुलींचे पालक आमच्याकडे नोंदणीसाठी आल्यानंतर काहीजण आवर्जून ‘वाडीतील स्थळ सुचवू नका,’ असेही म्हणतात. कऱ्हाडातील मधुरा वधू-वर सूचक केंद्राचे प्रमुख महेशकुमार कुत्ते सांगत होते, ‘वाडीतील मुले-मुलीही उच्चशिक्षित, संस्कारित आहेत. मात्र, तरीही ‘वाडी’चे कारण सांगून अनेकजण अशी स्थळं डावलतात. वाडीशी सोयरिक न करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात आहे. आम्ही कितीही समजून सांगितलं तरी मुला-मुलींचे आई-वडील वाडीत सोयरिक करण्यास तयारच होत नाहीत.’