शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

शेतकरी अपघात विमा योजनेलाच अपघात; १७६ पैकी ९४ प्रस्ताव अद्यापही प्रलंबितच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:39 IST

सातारा : शेतीची तसेच इतर कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. याचा विचार करून राज्य शासनाने ...

सातारा : शेतीची तसेच इतर कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. याचा विचार करून राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली असून, मागील वर्षभरात दाखल १७६ पैकी ७५ प्रस्तावच मंजूर झाले आहेत, तर ९४ प्रलंबित असून, ७ नामंजूर आहेत. त्याचबरोबर १९ मध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत.

दरवर्षी विविध अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. तसेच काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या माणसाचा अनैसर्गिक व अकाली मृत्यू झाल्याने अल्पभूधारक कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी राज्याने सर्व शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच अपघातावेळी त्यांचे वय १० ते ७५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक असते. तसेच शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू हा कोणत्याही प्रकारच्या अपघातानेच येणे आवश्यक आहे.

.........................

चौकट :

कोणाला किती मिळते मदत...

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मदत कुटुंबीयांना मिळते, तर अपंगत्व आल्यास एक लाखाचे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. विविध अपघातांसाठी ही विमा योजना राबविण्यात येते. विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी ही योजना लागू असते. तसेच संबंधित कालावधीत केव्हाही अपघात झाला तरी योजनेसाठी तो पात्र ठरतो.

...............................................

या अपघातासाठी मिळते मदत...

विमा योजनेंतर्गत विविध अपघातांसाठी मदत मिळते. यामध्ये रस्ता, रेल्वे अपघात झाल्यास शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबीयांना विमा रक्कम देण्यात येते. त्याचबरोबर पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशक किंवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू, सर्प आणि विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने रेबिज होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू, आदींमध्ये विमा योजनेचा लाभ मिळत असतो.

.........................................................

चौकट :

सर्वाधिक प्रकरणे रस्ते अपघाताची

शेतकऱ्यांना अपघात विमा योजना लागू केली आहे. २०२० या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला आहे, तर विमा योजनेंतर्गत १८ प्रकरणे रस्ता अपघाताची मंजूर झाली आहेत. यानंतर विजेच्या धक्क्याने मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे १२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यानंतर पाण्यात बुडून मृत्यू ७, सर्पदंश ३ आणि अन्य अपघातातील ३ प्रस्ताव मंजूर आहेत.

...................

२०२० वर्षात तालुकानिहाय विमा कंपनीस सादर प्रस्ताव आणि मंजूर प्रस्ताव

सातारा १८ ८

कोरेगाव १९ ९

खटाव २७ १३

कऱ्हाड २२ ५

पाटण १० ६

वाई १९ ८

जावळी १० ५

महाबळेश्वर २ १

खंडाळा ७ ४

फलटण १९ १०

माण २३ ६

..........................................................