शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेतकरी अपघात विमा योजनेलाच अपघात; १७६ पैकी ९४ प्रस्ताव अद्यापही प्रलंबितच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:39 IST

सातारा : शेतीची तसेच इतर कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. याचा विचार करून राज्य शासनाने ...

सातारा : शेतीची तसेच इतर कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. याचा विचार करून राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली असून, मागील वर्षभरात दाखल १७६ पैकी ७५ प्रस्तावच मंजूर झाले आहेत, तर ९४ प्रलंबित असून, ७ नामंजूर आहेत. त्याचबरोबर १९ मध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत.

दरवर्षी विविध अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. तसेच काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या माणसाचा अनैसर्गिक व अकाली मृत्यू झाल्याने अल्पभूधारक कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी राज्याने सर्व शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच अपघातावेळी त्यांचे वय १० ते ७५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक असते. तसेच शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू हा कोणत्याही प्रकारच्या अपघातानेच येणे आवश्यक आहे.

.........................

चौकट :

कोणाला किती मिळते मदत...

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मदत कुटुंबीयांना मिळते, तर अपंगत्व आल्यास एक लाखाचे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. विविध अपघातांसाठी ही विमा योजना राबविण्यात येते. विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी ही योजना लागू असते. तसेच संबंधित कालावधीत केव्हाही अपघात झाला तरी योजनेसाठी तो पात्र ठरतो.

...............................................

या अपघातासाठी मिळते मदत...

विमा योजनेंतर्गत विविध अपघातांसाठी मदत मिळते. यामध्ये रस्ता, रेल्वे अपघात झाल्यास शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबीयांना विमा रक्कम देण्यात येते. त्याचबरोबर पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशक किंवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू, सर्प आणि विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने रेबिज होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू, आदींमध्ये विमा योजनेचा लाभ मिळत असतो.

.........................................................

चौकट :

सर्वाधिक प्रकरणे रस्ते अपघाताची

शेतकऱ्यांना अपघात विमा योजना लागू केली आहे. २०२० या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला आहे, तर विमा योजनेंतर्गत १८ प्रकरणे रस्ता अपघाताची मंजूर झाली आहेत. यानंतर विजेच्या धक्क्याने मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे १२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यानंतर पाण्यात बुडून मृत्यू ७, सर्पदंश ३ आणि अन्य अपघातातील ३ प्रस्ताव मंजूर आहेत.

...................

२०२० वर्षात तालुकानिहाय विमा कंपनीस सादर प्रस्ताव आणि मंजूर प्रस्ताव

सातारा १८ ८

कोरेगाव १९ ९

खटाव २७ १३

कऱ्हाड २२ ५

पाटण १० ६

वाई १९ ८

जावळी १० ५

महाबळेश्वर २ १

खंडाळा ७ ४

फलटण १९ १०

माण २३ ६

..........................................................