शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

अंगणवाडी सेविकांचे ‘जेल भरो’

By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST

किमान वेतन : सेवानिवृत्ती वेतनही देण्याची मागणी

सातारा : कॉम्रेड चंद्रेश्वरी आयोगाच्या शिफारशी लागू करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या आणि इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गुरुवारी सातारा शहरात ‘जेल भरो’ आंदोलन केले. महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.केंद्रीय कर्मचारी म्हणून अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू व्हावे, साठ वर्षांवरील सेविकांना पेन्शन मिळावी, आंदोलनकाळातील पगार मिळावा, प्राथमिक शाळांप्रमाणे सेविका आणि मदतनीसांना एक महिन्याची उन्हाळी सुटी एकाच वेळी मिळावी, दिवाळीसाठी मानधनाएवढी भाऊबीज भेट मिळण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, मानधनाऐवजी पगाराची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, २००८ पासून सेवानिवृत्त झालेल्या सेविकांना एकरकमी पेन्शन मंजूर व्हावी, थकित रकमा त्वरित मिळाव्यात आणि मानधन वेळेत मिळावे, या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत.राज्य सरकारने रिक्त जागी काम केलेल्याचा मोबदला मासिक २००० रुपये प्रमाणे मिळावा, ग्रामीण प्रकल्पाच्या शहरी विभागातील अंगणवाडी केंद्रास किमान १००० रुपये भाडे मिळावे, सेविकांनी मानधनातून दिलेले भाडे परत करावे, अंगणवाडी तालुका प्रकल्प कार्यालयास जादा लिपिकवर्ग मंजूर व्हावा, सेविका-मदतनीसांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, चार तासांपेक्षा अधिक काम करून घेतल्यास ताशी २५ रुपयेप्रमाणे मोबदला मिळावा, टी. एच. आर. आहार बंद करावा, आहार शिजविण्याचे काम सेविका-मदतनीसांकडेच द्यावे, प्रतिलाभार्थी १० रुपये दर मिळावा, सेविका वैद्यकीय अधिकारी नसल्याने जंतनाशक गोळ््यांच्या वाटपाचे काम त्यांना देऊ नये, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.केंद्र शासनाने कामगारांच्या हिताविरोधी केलेले कायदे रद्द व्हावेत, खासगीकरण, कंत्राटीकरणास चालना मिळेल अशी कृती होऊ नये, तरुणांना स्थिर जीवन जगण्याची संधी मिळावी, दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील असा फरक रेशन कार्डात न करता ३५ किलो धान्य व १४ जीवनावश्यक वस्तू नियंत्रित दराने उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणीही सेविका-मदतनीसांनी केली. (प्रतिनिधी)अपुरे मानधन; बिलेही नाहीतगेले वर्षभर अंगणवाडी सेविकांना अपुरे मानधन मिळाले असून, पाच ते सहा महिन्यांची आहार बिलेही मिळाली नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. एक ते दीड वर्षांचा प्रवास भत्ता न मिळाल्याने त्या संतप्त झाल्या आहेत. या रकमा तातडीने देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार निवेदने देऊनही अंगणवाड्यांना रेशनिंग मिळत नाही. गरजेइतके धान्य अंगणवाडी केंद्रांना दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. योग्य कृती न झाल्यास दीर्घ आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.