शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

९१ हजार टीव्ही बंद!

By admin | Updated: January 3, 2016 00:48 IST

जिल्ह्यातील ‘सेटटॉप’ साठा संपला : बावीस गावांतील ३२ हजार २७० बॉक्स बसविले

सातारा : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील बावीस गावांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आत्तापर्यंत ३२ हजार २७० घरांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही ८० टक्के सेटटॉप बॉक्स न बसविल्यामुळे तब्बल ९१ हजार ५९२ घरांमधील टीव्हीवर ‘मुंगी डान्स’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे साताऱ्यातही सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्येच सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी सेटटॉप बॉक्स बसविलेच नाहीत. त्यामुळे केबल सर्व्हिस खंडित करण्यात आली आहे. सेटटॉप बॉक्स खेरेदीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही ठिकाणी खासगी दुकानांमध्ये हे सेटटॉप बॉक्स विकत मिळतात, अशी अफवा पसरवली गेल्यामुळे नागरिक निर्धास्त होते; परंतु हे सेटटॉप बॉक्स केबल चालकांनी खरेदी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. मात्र केबल चालकांकडेच सेटटॉप बॉक्सचा साठा संपल्यामुळे नागरिकांना ‘मुंगी डान्स’ अजून किती दिवस पाहावा लागणार, याबाबत कोणाकडेच ठोस माहिती नाही. ज्या लोकांनी सेटटॉप बॉक्स बसविले नाहीत. तरीही त्यांच्या टीव्ही सुरू असतील तर प्रांताधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सेटटॉप बॉक्स संदर्भात तहसीलदारांना अधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. अनेक लोकांना सेटटॉप बॉक्सबाबत माहिती मिळत नसल्याने नाराजी पसरत आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करमणूक विभागामध्ये केवळ चार कर्मचारी असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नेटवर्क सांभाळणे कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. पुढच्या डिसेंबरपर्यंत तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात सेटटॉप बॉक्स सक्तीचा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)