शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावचे शहरीकरण भाजपच्या पथ्यावर!--

By admin | Updated: May 31, 2016 00:38 IST

नगरपंचायत उलथापालथ--मोर्चेबांधणी जिल्ह्यात नवीन पाच नगरपंचायती, सुशिक्षित शहरी मतदार भाजपच्या डोळ्यासमोर! काँग्रेस-राष्ट्रवादीची पकड आजही ग्रामीण भागात..जिल्हा परिषदेच्याही राजकारणावर परिणाम

सागर गुजर ल्ल साताराकेंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाकडे शहरी मतदारांचा ओढा आहे, हे मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले होते. हाच धागा पकडून राष्ट्रवादी व काँगे्रसच्या साम्राज्यात घुसण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणांना नगरपंचायतींचा दर्जा देऊन भाजपने नवी रणनीती हाती घेतली आहे. मलकापूर, कोरेगाव व लोणंदनंतर आता सातारा जिल्ह्यातील पाटण, दहिवडी, खंडाळा, मेढा, वडूज या तालुक्यांच्या ठिकाणच्या गावांना नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घोषणा केल्यानंतर ‘लोकमत’ने मार्च महिन्यात हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. यानंतर नगरपंचायतीच्या निर्मितीला गती मिळाली होती. जिल्ह्यामध्ये सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या आठ नगपरिषदा आहेत. तर मलकापूर, कोरेगाव, लोणंद, पाटण, दहिवडी, खंडाळा, मेढा, वडूज या आठ नगरपंचायती झाल्या आहेत. नगरपंचायतींना महाराष्ट्र रिजिनल अँड टाऊन प्लानिंग कायदा १९६६ लागू होतो. तसेच नगरपंचायतींच्या गावांचा झपाट्याने विकास होतो. जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या घोषणेनंतर येथे चौफेर विकास झाला. रस्ते, पाणी योजना, दलित वस्ती विकास या पायाभूत सुविधांसह इतर सुविधा नागरिकांना पुरविणे सोपे जाते. राज्यासह केंद्र शासनाचाही निधी नगरपंचायतीला मिळत असल्याने निधीअभावी रखडलेला विकास होत असतो, हे वास्तव आहे. विकासाच्या बाबतीत विचार केल्यास सत्ताधाऱ्यांचे हे प्रशासकीय धोरण वाखाणण्याजोगे ठरले आहे. मात्र या धोरणामागे त्यांचा राजकीय डाव दडलेला नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादीने आपला सातारा बालेकिल्ला शाबूत ठेवला. भाजपला या निवडणुकीत सपशेल अपयश आले. मात्र, शहरी भागातील मतदारांची साथ भाजपला मिळाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी सरकारने केलेली घोषणा काँगे्रस-राष्ट्रवादीला अस्वस्थ करणारी ठरली असून, या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.नगरपंचायतीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणांची निवडणुकीपूर्वी मोडतोड करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा परिणाम प्रकर्षाने जाणवणार असून, या परिस्थितीचा भाजप लाभ उठविण्याची शक्यता आहे. शहरी मताधिक्क्यावर कब्जा! साताऱ्याचाच विचार केला तर सातारा-जावळीतील बहुतांश सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात उभ्या असलेल्या भाजपच्या दीपक पवार यांना विधानसभा निवडणुकीत सातारा शहरातून ३ हजार २०० चे मताधिक्य मिळाले होते. शहरी भागातून भाजपला आपसूक चांगली साथ मिळत असल्याने सातारा जिल्ह्यातील पाच प्रमुख गावांना नगरपंचायतीचा दर्जा देऊन शहरी मताधिक्यावर कब्जा मिळविण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.