शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत ७८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST

सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून, गत दोन दिवसांत तब्बल ७८ जणांचा कोरोनाने बळी घेतला ...

सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून, गत दोन दिवसांत तब्बल ७८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत चिंताजनक बाब असून, प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. तसेच दोन दिवसांत नवे ४ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, बळींची संख्या २ हजार ५७४ वर, तर कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७ हजार ४७२ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात अलीकडे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक असून, मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. नागरिक अंगावर आजार काढत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे.

सातारा शहरात बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. शनिवारी एकाच दिवशी ५१५ जण बाधित आढळून आले आहेत. शहरातील प्रामुख्याने मोजक्याच भागाला कोरोनाचा विळखा पडला आहे. करंजे, मंगळवार पेठे, राजसपुरा पेठेचा काही भागांत कमी रुग्ण आढळून येत आहेत, तर शहरातील गोडोली, शाहूनगर या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

दरम्यान, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोणाच्या घरातील करता व्यक्ती, तर कोणाच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती बळी गेल्याच्या घटना घडत आहेत. ब्रेक द चेनमुळे रस्ते ओस असले तरी त्या रस्त्यावरून रुग्णवाहिका सायरन वाजवत जाताना काळजात धडकी भरवून जात आहे. सातारा शहरात आतापर्यंत १२७ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यात कोरोना बळीं जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून शहरातील मध्यमवर्गीयांना कोरोनाने चांगलेच त्रस्त आहे. कोरोनाची साखळी काही केल्या तुटत नाही. मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन जीव तोड मेहनत घेत आहे. परंतु किरकोळ आजार अंगावर काढल्याने कोरोनाचा बळी पडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. मृतांमध्ये सातारा तालुका नंबर वनला, तर वाई तालुका द्वितीय नंबरला आहे. वाई तालुक्यात काही गावांमध्ये आणि वाई शहरात संसर्ग तुटत नाही.त्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे.

एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना मुक्तीचेही प्रमाण चांगले आहे. रविवारी दिवसभरात ४४० जण, तर आतापर्यंत ८४ हजार २५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चौकट : सातारा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट

जिल्ह्यात सर्वांत महाभयंकर परिस्थिती सातारा शहर आणि तालुक्यात आहे. सातारा तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून, रविवारी या तालुक्यात तब्बल ४९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ कराड तालुक्यामध्ये २६३ बाधित, तर १० जणांचा मृत्यू झालाय. तसेच जावळी, कोरेगाव, महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यांमध्ये रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याशिवाय खटाव तालुक्यांमध्ये ६, माण तालुक्यामध्ये २ आणि वाई तालुक्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कराड तालुक्यामध्ये ही रुग्णसंख्या वाढत असून, रविवारी नवे २६३ रुग्ण आढळून आले आहेत.