शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत ७४ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: August 3, 2014 01:52 IST

वीरमधून विसर्ग थांबविला : पावसाचा जोर मंदावला

सातारा/ कोयनानगर / पाटण : गेले काही दिवस सुरू असलेली संततधार शनिवारी थोडी थांबली. काही भागांत पावसाचा जोर थांबला असल्यामुळे धरणातील येवा कमी झाला असून, परिणामी पाणीसाठाही कमी वेगाने वाढत आहे. कोयना धरणातील येवा ४० हजार ६२ क्युसेक इतका असून, शनिवारी सकाळी पाच वाजता ७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. वीर धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. अन्य धरणांतील पाण्याचा विसर्गही कमी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत जोरदार सरी कोसळत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार संततधार होत असल्यामुळे पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. मात्र, शनिवारी पावसाचा जोर अचानकपणे मंदावला आहे. उरमोडी, तारळी, वीर धरण लाभक्षेत्रांत जोरदर सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत होता. धरणाच्या दरवाजातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे उरमोडी आणि तारळी नदी पात्राच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोम धरणाची पाणीसाठवण क्षमता १३.५० टीएमसी इतकी असून, धरणात आजमितीस ९.४७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. कण्हेर धरणात ९.१० टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरण भरण्यास अजून एक टीएमसी पाणी हवे आहे. उरमोडी धरणातून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू असून, धरणात ८.७५ टीएमसी इतके पाणी आहे. धरणाची एकूण क्षमता ९.८० टीएमसी इतकी आहे. धोम-बलकवडी धरणाची क्षमता ४.०८ टीएमसी असून, धरणात ३.५४ टीएमसी पाणीसाठा आहे. तारळी धरणात ४.८९ टीएमसी पाणीसाठा असून, क्षमता ५.८५ टीएमसी आहे. धरणातून २९४६ क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात होत आहे. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, धरणात आजमितीस ७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही २६.२५ टीएमसी इतके पाणी हवे आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी धरणातील येवा चांगला आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढत चालला आहे. पावसाचा जोर वाढला तरी बहुधा याच महिन्यात धरण भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ ते सांयकाळी पाच या वेळेत कोयना ११ (३२१९), नवजा ६१ (३८५१) तर महाबळेश्वर येथे १२ (३०१८) मिमी पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शनिवारी पहाटे आणि शुक्रवारी दिवसभरात १३३.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक ६८.८ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली. जिल्ह्यात आजअखेर एकूण ७५८१.३ मिमी पावसाची नोंद झाली असूून, तालुकानिहाय सरासरी ६८९.२ मिमी इतकी आहे. प्रतिनिधी)