शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

राज्यात ज्ञानज्योतींच्या नावाने ७२ महिला वसतिगृहे उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 08:36 IST

छगन भुजबळ; नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा (जि. सातारा) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मगाव नायगावपुरते मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहोचविले पाहिजे. नायगावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्र शासन व महाज्योतीच्यावतीने राज्यभरात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ७२ वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी घोषणा अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

नायगाव (ता. खंडाळा)  येथे सोमवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, बापूसाहेब भुजबळ, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, पंचायत समिती सभापती अश्विनी पवार यांची उपस्थिती होती.

भुजबळ म्हणाले, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्ञानसंकुल नायगाव येथे देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करून या ठिकाणी एनडीए व स्पर्धा पूर्वपरीक्षा निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संकुलासाठी व विविध बाबींचा विकास करण्यासाठी ओबीसी मंत्रालय व शासनाकडे ५० कोटी रुपयांचा आराखडा पाठविला आहे. नायगाव येथे निवासी प्रशिक्षण संस्था, निवासी शाळा व अन्य बाबींचा विकास महाज्योती संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार आहे. नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची करण्यात येईल. भिडेवाड्यात लवकरच ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ याच नावाने सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासनाची धावपळकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये यासाठी नायगाव येथील स्मारकास अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेसात वाजताच आले. त्यामुळे प्रशासनाची व समितीची धावपळ झाली.