शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

टाटा सुमो पुलावरुन कोसळून सात जखमी

By admin | Updated: May 13, 2014 23:53 IST

भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गावरुन जाणारी टाटा सुमो गाडी बदेवाडी गावालगत असणार्‍या दोन पुलांमध्ये तब्बल पंचवीस फूट खोल कोसळली.

 भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गावरुन जाणारी टाटा सुमो गाडी बदेवाडी गावालगत असणार्‍या दोन पुलांमध्ये तब्बल पंचवीस फूट खोल कोसळली. मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातात सात जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, हा अपघात इतका भयानक होता, की दैव बलवत्तर म्हणूनच सुमोतील सर्वजण बचावले. हा अपघात रिलायन्स कंपनीच्या चुकीच्या व अपुर्‍या बांधकामामुळेच झाला असून अपघाताबाबत रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती अशी, हेमंत नारायण भोसले, रा. चाहूर, ता. वाई हल्ली रा. नागठाणे, ता. सातारा हे आपली टाटा सुमोर क्र. एमएच ११ एल ९९९0 घेऊन सातारा बाजूकडून पुणेकडे निघाले होते. त्याच्यासह टाटा सुमोत सात जण होते. ही गाडी भुर्इंज पोलीस ठाण्यापासून पुढे गेल्यानंतर रात्री २ वाजता दोन्ही रस्त्यामध्ये असणार्‍या दुभाजकावर गेली आणि पुलाखाली कोसळली. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने जवळच असणार्‍या बदेवाडी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना मदत करुन गाडीबाहेर काढले. सुमो चालक हेमंत भोसले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर इतर सात जण किरकोळरित्या जखमी झाले. वेळेपासून सातारापर्यंत असणारे सर्वच पूल उत्तर व दक्षिण बाजूस संरक्षण कठडे नसल्याने धोकादायक बनले आहेत. महामार्ग प्राधिकरणाने यात गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असून संरक्षक कठडे न बांधल्यास मोठे अपघात होऊ शकतात. महामार्ग प्राधिकरणच्या गलथानपणामुळे शिरवळ येथील नीरा नदीत झालेल्या अपघाताप्रमाणेच एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहिली जात आहे. या अपघाताची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सय्यद करीत आहेत. (वार्ताहर)