शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

४९ ग्रामपंचायतींसाठी ६८७ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील ५६ पैकी ७ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: तर १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी ...

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील ५६ पैकी ७ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: तर १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत तब्बल ३४७ जणांनी माघार घेतली आहे. आता ४९ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होत आहे. ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १ हजार १६६ अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेमध्ये ८ अर्ज अवैद्य ठरविण्यात आल्याने ११५८ अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारी दुपारी संपली. ३४७ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ८ ग्रामपंचायतींची पूर्णत: तर १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ४९ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होत आहे. ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

चौकट :

दुरंगी लढत...

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ८ गावांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नेतेमंडळींनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली तरी त्या-त्या गावांमध्ये उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे. एकूणच ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने थेट दुरंगी लढत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.