शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६५० शिक्षकांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:25 IST

सांगली : जिल्ह्यातील पाच हजार ९१९ कार्यरत शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांची सेवा अखंडित दहा वर्षे जिल्हा परिषदेकडे झाली आहे, त्या ...

सांगली : जिल्ह्यातील पाच हजार ९१९ कार्यरत शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांची सेवा अखंडित दहा वर्षे जिल्हा परिषदेकडे झाली आहे, त्या सर्वच शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने यंदाही होणार आहेत. याबाबतचे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेला सोमवारी दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते सातशे शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता आहे. या बदलीमधून ५३ वर्षांवरील सर्व शिक्षकांना वगळण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात एक हजार ६९८ जिल्हा परिषद शाळा असून, पाच हजार ६० शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी चार हजार ७३० शिक्षक कार्यरत असून ३२१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. कार्यरत शिक्षकांची जिल्हा परिषदेकडील सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झाली असेल, ते शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. त्यानुसारच शिक्षकांच्या बदलीची ज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाने बदलीची प्रक्रिया सुरु केली आहे. दि. १३ ते २० मे या कालावधित शिक्षण विभागाने अवघड व सर्वसाधारण क्षेत्रामध्ये कार्यरत शिक्षकांची यादी तयार करणे, महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय नावांची यादी घोषित करण्यात येणार आहे. समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या शाळेतील जागांची यादी घोषित करताना मागीलवर्षी ज्या शाळांमध्ये समानीकरणासाठी रिक्त ठेवलेल्या जागा आहेत, त्यामध्ये शक्यतो बदल करू नये, नवीन संचमान्यतेमुळे जर बदल करणे अनिवार्य असेल, तरच अशा शाळांमध्ये सक्तीने रिक्तमध्ये बदल करावा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच २१ मे २०१९ पासून हरकतीवर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करायची आहे.बदलीपात्र शिक्षकांच्या ३१ मेपूर्वीच बदल्या करण्याचे ग्रामविकास विभागाचे धोरण आहे. शासनाच्या नवीन आदेशामुळे जिल्ह्यातील जवळपास सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.शिक्षकांनी बदल्यांची अचूक माहिती भरावी : नीशादेवी वाघमोडे-बंडगरराज्य शासनाकडून यावर्षीही आॅनलाईनच बदल्या होणार आहेत. यासाठी सर्वच शिक्षकांनी आपली माहिती संगणकीय प्रणालीवर नोंदणी करायची आहे. बदलीपात्र शिक्षकांनी शिक्षण विभागाकडून योग्य माहिती घेऊनच बदल्यांबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर भरायची आहे. यामध्ये सक्तीने रिक्त ठेवण्यात येणाºया शाळांची यादी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे असल्यामुळे तेथूनही तुम्ही माहिती घेऊ शकता. शिक्षकांनी अर्ज भरताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे-बंडगर यांनी केले.बदलीनंतर तीन वर्षे शिक्षकांना दिलासाबदलीपात्र शिक्षकाची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर, पुन्हा तीन वर्षे ‘त्या’ शिक्षकाची बदली केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने ८ मार्च २०१९ च्या शासन शुध्दीपत्रकात दिले आहेत. शासनाच्या नवीन आदेशामुळे गतवर्षी बदली झालेल्या दोन हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.