शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने जावलीतील ५६१.६० हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे ...

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे पात्रच बदलल्यामुळे शेतीचे बांध, ताली वाहून गेल्या. वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन पुरती भरून गेली. नदी, ओढ्याकाठची शेतीच गायब झाली. यामुळे तालुक्यातील ५६१.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यातील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांतर्गत पंचनामे झाले आहेत,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

अस्मानी संकटामुळे जावळीतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने केळघर आणि परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभ्या भात पिकांसह शेतीच वाहून गेली. याचबरोबर रस्ते आणि महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला. पश्चिम विभागातील बामणोली भागात शेतजमीन अन‌् रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली.

शेतातील अनेक विहिरी गाळाने भरल्या. डोंगरावरून वाहून आलेले मोठमोठे दगड, झाडांची खोडे शेतात येऊन साचली. कधीही भरून न निघणारे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले. कोरोना काळात शेतीमध्ये केलेली सुधारणा या पुरामध्ये विरून गेली. यामुळे अनेकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चौकट :

या परिस्थितीत येथील जनतेला पदाधिकारी, अधिकारी, विविध संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे हळूहळू येथील जीवन पूर्वपदावर येत आहे. लोक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटातून सावरत स्वतःला सिद्ध करीत पुन्हा एकदा उभारी घेण्याची आता खरी गरज आहे.

फोटो १३कुडाळ

जावळी तालुक्यातील केळघर भागातील शेतीचे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. (छाया : विशाल जमदाडे)