शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अतिवृष्टीने जावलीतील ५६१.६० हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे ...

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे पात्रच बदलल्यामुळे शेतीचे बांध, ताली वाहून गेल्या. वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन पुरती भरून गेली. नदी, ओढ्याकाठची शेतीच गायब झाली. यामुळे तालुक्यातील ५६१.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यातील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांतर्गत पंचनामे झाले आहेत,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

अस्मानी संकटामुळे जावळीतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने केळघर आणि परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभ्या भात पिकांसह शेतीच वाहून गेली. याचबरोबर रस्ते आणि महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला. पश्चिम विभागातील बामणोली भागात शेतजमीन अन‌् रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली.

शेतातील अनेक विहिरी गाळाने भरल्या. डोंगरावरून वाहून आलेले मोठमोठे दगड, झाडांची खोडे शेतात येऊन साचली. कधीही भरून न निघणारे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले. कोरोना काळात शेतीमध्ये केलेली सुधारणा या पुरामध्ये विरून गेली. यामुळे अनेकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चौकट :

या परिस्थितीत येथील जनतेला पदाधिकारी, अधिकारी, विविध संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे हळूहळू येथील जीवन पूर्वपदावर येत आहे. लोक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटातून सावरत स्वतःला सिद्ध करीत पुन्हा एकदा उभारी घेण्याची आता खरी गरज आहे.

फोटो १३कुडाळ

जावळी तालुक्यातील केळघर भागातील शेतीचे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. (छाया : विशाल जमदाडे)