शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अतिवृष्टीने जावलीतील ५६१.६० हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे ...

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे पात्रच बदलल्यामुळे शेतीचे बांध, ताली वाहून गेल्या. वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन पुरती भरून गेली. नदी, ओढ्याकाठची शेतीच गायब झाली. यामुळे तालुक्यातील ५६१.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यातील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांतर्गत पंचनामे झाले आहेत,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

अस्मानी संकटामुळे जावळीतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने केळघर आणि परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभ्या भात पिकांसह शेतीच वाहून गेली. याचबरोबर रस्ते आणि महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला. पश्चिम विभागातील बामणोली भागात शेतजमीन अन‌् रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली.

शेतातील अनेक विहिरी गाळाने भरल्या. डोंगरावरून वाहून आलेले मोठमोठे दगड, झाडांची खोडे शेतात येऊन साचली. कधीही भरून न निघणारे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले. कोरोना काळात शेतीमध्ये केलेली सुधारणा या पुरामध्ये विरून गेली. यामुळे अनेकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चौकट :

या परिस्थितीत येथील जनतेला पदाधिकारी, अधिकारी, विविध संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे हळूहळू येथील जीवन पूर्वपदावर येत आहे. लोक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटातून सावरत स्वतःला सिद्ध करीत पुन्हा एकदा उभारी घेण्याची आता खरी गरज आहे.

फोटो १३कुडाळ

जावळी तालुक्यातील केळघर भागातील शेतीचे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. (छाया : विशाल जमदाडे)