शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

अतिवृष्टीने जावलीतील ५६१.६० हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे ...

कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे पात्रच बदलल्यामुळे शेतीचे बांध, ताली वाहून गेल्या. वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन पुरती भरून गेली. नदी, ओढ्याकाठची शेतीच गायब झाली. यामुळे तालुक्यातील ५६१.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यातील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांतर्गत पंचनामे झाले आहेत,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

अस्मानी संकटामुळे जावळीतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने केळघर आणि परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभ्या भात पिकांसह शेतीच वाहून गेली. याचबरोबर रस्ते आणि महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला. पश्चिम विभागातील बामणोली भागात शेतजमीन अन‌् रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली.

शेतातील अनेक विहिरी गाळाने भरल्या. डोंगरावरून वाहून आलेले मोठमोठे दगड, झाडांची खोडे शेतात येऊन साचली. कधीही भरून न निघणारे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले. कोरोना काळात शेतीमध्ये केलेली सुधारणा या पुरामध्ये विरून गेली. यामुळे अनेकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चौकट :

या परिस्थितीत येथील जनतेला पदाधिकारी, अधिकारी, विविध संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे हळूहळू येथील जीवन पूर्वपदावर येत आहे. लोक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटातून सावरत स्वतःला सिद्ध करीत पुन्हा एकदा उभारी घेण्याची आता खरी गरज आहे.

फोटो १३कुडाळ

जावळी तालुक्यातील केळघर भागातील शेतीचे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. (छाया : विशाल जमदाडे)