शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

कृष्णा कारखान्यावर ५२0 कोटींचा बोजा

By admin | Updated: July 13, 2015 00:35 IST

कामगार वेतन २ कोटी : शिल्लक मात्र २२ लाख; आर्थिक संकटामुळे चिंता

अशोक पाटील -इस्लामपूर -दक्षिण महाराष्ट्रातील नावाजलेला कृष्णा सहकारी साखर कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणूनच सभासदांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलच्या हातात कारखाना सोपविला आहे. शनिवार दि. ११ जुलै रोजी कारखाना कार्यस्थळावर सर्व नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीत, सध्या कारखान्याकडे फक्त २२ लाख रुपये शिल्लक आहेत, त्यामुळे कामगारांच्या जुलै महिन्याच्या पगारासाठी लागणाऱ्या २ कोटी रुपयांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच कारखान्यावर असलेल्या ५२0 कोटी रुपयांच्या कर्जाचे काय? यावरही वादळी चर्चा झाली.सध्या कारखान्यात कामगार किती आहेत, याची मोजदाद केली जात आहे. कामापेक्षा कामगारांचीच संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. या कामगारांना पगार देण्यासाठीही कारखान्याकडे पैसे नाहीत. सध्या कामगारांच्या पगारासाठी २ कोटींची रक्कम प्रत्येक महिन्याला लागते. परंतु कारखान्याकडे सध्या फक्त २२ लाख रुपये शिल्लक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर अध्यक्ष भोसले यांच्यासह सर्वच संचालकांना मोठा धक्का बसला.कारखान्यावर वेगवेगळ्या बँकांचे ३७१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. भविष्यात या कारखान्यास कर्ज मिळविण्यासाठी पूर्वीची कर्ज प्रकरणे नूतनीकरण करावी लागणार आहेत. परंतु ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच कारखान्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसल्याने बँका कर्ज देतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.या बैठकीस माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह संस्थापक पॅनेलचे ५ संचालक उपस्थित होेते. या संचालकांना जितेंद्र पाटील, जगदीश जगताप, अमोल गुरव, दयानंद पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अविनाश मोहिते यांनी बैठक सोडून जाणेच पसंत केले. यापूर्वी सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेतून होत होते. आता या बँकेनेही कर्जास नकार दिल्यास सहकार पॅनेलला स्वत:च्या कृष्णा बँकेचा आधार घ्यावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे कारखान्याकडे सभासदांना पुढचे बिल देण्यासाठीही पैसे नाहीत. साखरेला मागणी नसल्याने तीही पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामातही ऊस उत्पादकांना दर देणे अवघड होणार आहे. त्यामुळे भोसले यांनी, वायफळ खर्च कमी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.कामगारांची होरपळ..!सत्ता बदलल्यानंतर कामगारांवर उपासमारीची वेळ येत असते. यावेळीही तसाच प्रकार सुरु झाला आहे. नूतन अध्यक्षांनी हंगामी १५00 कामगारांना कमी केले आहे. यातून आपला कोण, परका कोण याची शहानिशा करुनच त्यांना कामावर पुन्हा घेण्याचे धोरण ठरले आहे.