शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सातारा जिल्ह्यात ४६७ अतितीव्र कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:56 IST

प्रशांत कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ४,८१० अंगणवाड्यांमध्ये ४६७ अतितीव्र तर १,८३४ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी पाच कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या ...

प्रशांत कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ४,८१० अंगणवाड्यांमध्ये ४६७ अतितीव्र तर १,८३४ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी पाच कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या अहवालानुसार यावर्षी अती तीव्र बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले.एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आला. मध्यम तीव्र कुपोषित (मॅम), अतितीव्र कुपोषित (सॅम) अशा दोन प्रकारांत कुपोषित बालकांची वर्गवारी करण्यात आली. यापूर्वी कुपोषित बालकांना लोकसहभागातून पोषण आहार मिळत असे. यावर्षीपासून शासनाने अनुदान लागू केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील स्थानिक पातळीवरील ग्राम बाल विकास केंद्रामार्फत ही योजना राबविली जाते. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचा अंगणवाडी, वाड्या-वस्त्यांमधून शोध घेतला जातो. त्यानंतर बालकांची वयोगट अन् वजन आदींबाबत तपासणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर या बालकांचा मॅम आणि सॅम या वर्गावारीत समावेश केला जातो.जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अती तीव्र कुपोषित बालकांची संख्या सातारा तालुक्यात ७२, जावळी ६, कोरेगाव ४४, खंडाळा ३४, फलटण ५१, खटाव ३७, कºहाड ६९, पाटण ४५, महाबळेश्वर ६, माण २५ तर वाई तालुक्यात ४४ इतकी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनांतर्गत डिसेंबर २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ११८७ तर अतितीव्र कुपोषितांची संख्या १८६ इतकी होती. मार्च २०१६-१७ च्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८८७ तर तीव्र कुपोषितांची संख्या १२८ इतकी नोंदविली गेली होती. लोकसहभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामविकास केंद्राचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुुलनेत कºहाड तालुक्याची स्थिती चांगली आहे.राज्य शासनाने या वर्षीपासून पोषण अभियान राबविला असून, यामध्ये राज्यातील ३७ जिल्ह्यांमधून केवळ सहा जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा सहभाग आहे. प्रथम टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांना पोषण अभियान लागू केला आहे. पुढील वर्षापासून सातारा जिल्ह्याचाही पोषण अभियानात समावेश होणार आहे.पोषण महिना अंतर्गत कृती आराखडापोषण महिना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्याचे वाटप करणे, प्रभात फेरी काढणे, पोषण आहारावर चित्रफीत दाखविणे, बालकांचे वजन व छाननी करणे, शाळामध्ये योग्य आहाराचे सेवन, महिलांसाठी योगा, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, बचत गटांची एकत्रित चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत जनजागृतीसाठी गृहभेटीसह विविध कार्यक्रम, आरोग्य व पोषण विषयाचे प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, विविध फळांच्या पोषाखासह फॅन्सी ड्रेस, शालेय निबंध स्पर्धा अशा अनेक योजनांचा प्रचार व प्रसिद्धी सध्या सुरू आहे.अद्याप सुधारणा न झालेली ९१ बालकेग्राम बाल विकास योजनेत दाखल झालेल्या ४१५ अती तीव्र कुपोषित २४७ बालकांची सुधारणा झाली असून, सर्वसाधारण श्रेणीमध्ये ८० बालकांचा समावेश झाला आहे. अद्याप सुधारणा न झालेल्या बालकांची संंख्या ९१ इतकी आहे. तर ग्राम बाल विकास योजनेत ४९ बालकांची नोंद पालकांकडून झाली नाही.