शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यातील ४१६ गावे अतिवृष्टीच्या कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

सागर गुजर सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना ...

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.

नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्युमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत केली.

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक अशा एकूण मालमत्तेचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधीमधून ९ लाखांची मदत करण्यात येत आहे. मात्र, ज्यांच्या शेतांचे नुकसान झाले आहे, पिके वाहून गेली आहेत, त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. शेतात दगडगोटे साठले असल्याने ते काढून टाकण्यासाठीही उपाययोजना करावी लागणार आहे.

११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. ४९ हजार १४९ लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. नदीकाठापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. शाळा, सार्वजनिक हॉल या ठिकाणी या कुटुंबांना ठेवण्यात आले.

बाधित शेतीक्षेत्र ४ हजार ३७३ हेक्टर

जमीन वाहून गेली ७८६ हेक्टर

सहा व्यक्ती अजूनही बेपत्ता...

जोरदार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला. तर अनेक ठिकाणी डोंगरांवर भूस्खलन झाले. पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून गेले. वाई तालुक्यातील २, पाटण तालुक्यातील १ तर सातारा तालुक्यातील ३ जण अजूनही बेपत्ता आहेत.

कोट..

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने तत्काळ हाती घेतले. सुरुवातीला मदतकार्य करणे गरजेचे होते. आता पंचनामे पूर्ण करून बाधितांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शेखर सिंह, जिल्हाधिकारी