शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

जिल्ह्यातील ४१६ गावे अतिवृष्टीच्या कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

सागर गुजर सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना ...

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.

नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्युमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत केली.

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक अशा एकूण मालमत्तेचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधीमधून ९ लाखांची मदत करण्यात येत आहे. मात्र, ज्यांच्या शेतांचे नुकसान झाले आहे, पिके वाहून गेली आहेत, त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. शेतात दगडगोटे साठले असल्याने ते काढून टाकण्यासाठीही उपाययोजना करावी लागणार आहे.

११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. ४९ हजार १४९ लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. नदीकाठापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. शाळा, सार्वजनिक हॉल या ठिकाणी या कुटुंबांना ठेवण्यात आले.

बाधित शेतीक्षेत्र ४ हजार ३७३ हेक्टर

जमीन वाहून गेली ७८६ हेक्टर

सहा व्यक्ती अजूनही बेपत्ता...

जोरदार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला. तर अनेक ठिकाणी डोंगरांवर भूस्खलन झाले. पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून गेले. वाई तालुक्यातील २, पाटण तालुक्यातील १ तर सातारा तालुक्यातील ३ जण अजूनही बेपत्ता आहेत.

कोट..

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने तत्काळ हाती घेतले. सुरुवातीला मदतकार्य करणे गरजेचे होते. आता पंचनामे पूर्ण करून बाधितांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शेखर सिंह, जिल्हाधिकारी