शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४१६ गावे अतिवृष्टीच्या कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

सागर गुजर सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना ...

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यामध्ये २२, २३ व २४ जुलै रोजी आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.

नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्युमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत केली.

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक अशा एकूण मालमत्तेचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधीमधून ९ लाखांची मदत करण्यात येत आहे. मात्र, ज्यांच्या शेतांचे नुकसान झाले आहे, पिके वाहून गेली आहेत, त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. शेतात दगडगोटे साठले असल्याने ते काढून टाकण्यासाठीही उपाययोजना करावी लागणार आहे.

११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ११ हजार ४५२ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. ४९ हजार १४९ लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. नदीकाठापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. शाळा, सार्वजनिक हॉल या ठिकाणी या कुटुंबांना ठेवण्यात आले.

बाधित शेतीक्षेत्र ४ हजार ३७३ हेक्टर

जमीन वाहून गेली ७८६ हेक्टर

सहा व्यक्ती अजूनही बेपत्ता...

जोरदार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला. तर अनेक ठिकाणी डोंगरांवर भूस्खलन झाले. पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून गेले. वाई तालुक्यातील २, पाटण तालुक्यातील १ तर सातारा तालुक्यातील ३ जण अजूनही बेपत्ता आहेत.

कोट..

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने तत्काळ हाती घेतले. सुरुवातीला मदतकार्य करणे गरजेचे होते. आता पंचनामे पूर्ण करून बाधितांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शेखर सिंह, जिल्हाधिकारी