शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यातील ४१० गावे पुन्हा प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून ...

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून नेले. परिणामी ४२६ गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे ४१० गावे पुन्हा प्रकाशमान करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यात दि. २२ व २३ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले. तब्बल ४२६ गावे व तेथील २ हजार ५० रोहित्रांना याचा फटका बसला. दीड हजारांहून अधिक खांब जमीनदोस्त झाले. घरगुती व व्यापारी वर्गवारीतील ६६ हजार ६५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले. हे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे होते. महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करुन हे आव्हानात्मक काम कमी कालावधीत पूर्ण करत आणले आहे.

बुधवार, दि. २८ पर्यंत ४२६ पैकी ४१० गावे पुन्हा प्रकाशमान झाली आहेत. १८१ पोल उभे करून बंद पडलेली १ हजार ५६४ रोहित्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे घरगुती, व्यापारी मिळून ६४ हजार ४२४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला तर शेतीच्या १७ हजार २४४ पैकी ८ हजार ४२२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. सर्व मिळून ७३ हजार ८९ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १६ गावांचा वीजपुरवठा बंद असून, तो सुरू करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

(चौकट)

या गावांची वीज खंडित

महाबळेश्वर : धारे, बिरवडी, जावली, छतीरबेट, घोणसपूर व घरोशी

जावली : वहिटे, बाहुले, भूतेघर व बोंडरवाडी

पाटण : निगडे, कठनी, घोटील, जिंती व उमरकांचन

कऱ्हाड : जुझारवाडी

(चौकट)

१२ खांब उभे करून केळघर वाहिनी सुरू

अतिवृष्टीमुळे मेढा उपविभागातील केळघर उच्चदाब वाहिनीचे १२ खांब पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १२ गावांचा वीजपुरवठा ठप्प झालेला. मंगळवारी वीज कर्मचारी व व स्थानिक ठेकेदारांच्या कामगारांनी खांद्यावर कावड करून खांब वाहून नेले. सर्व अडचणींवर मात करून कामगारांनी १२ खांब उभे केले. यानंतर केळघर, केडंबे, नांदघणे, वरोशी, पुनवडी, डांगरेघर, कुरुळोशी, धावली, तळोशी, वाळंजवाडी, वाटंबे, मुकवली, या गावांतील एकूण ७२८ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

फोटो : २८ एमएसईबी फोटो

वीज कर्मचाऱ्यांनी केळघर वाहिनीचे खांब खांद्यावर वाहून नेऊन केळघर विभागातील बारा गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला.