शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यातील ४१० गावे पुन्हा प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून ...

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून नेले. परिणामी ४२६ गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे ४१० गावे पुन्हा प्रकाशमान करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यात दि. २२ व २३ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले. तब्बल ४२६ गावे व तेथील २ हजार ५० रोहित्रांना याचा फटका बसला. दीड हजारांहून अधिक खांब जमीनदोस्त झाले. घरगुती व व्यापारी वर्गवारीतील ६६ हजार ६५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले. हे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे होते. महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करुन हे आव्हानात्मक काम कमी कालावधीत पूर्ण करत आणले आहे.

बुधवार, दि. २८ पर्यंत ४२६ पैकी ४१० गावे पुन्हा प्रकाशमान झाली आहेत. १८१ पोल उभे करून बंद पडलेली १ हजार ५६४ रोहित्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे घरगुती, व्यापारी मिळून ६४ हजार ४२४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला तर शेतीच्या १७ हजार २४४ पैकी ८ हजार ४२२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. सर्व मिळून ७३ हजार ८९ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १६ गावांचा वीजपुरवठा बंद असून, तो सुरू करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

(चौकट)

या गावांची वीज खंडित

महाबळेश्वर : धारे, बिरवडी, जावली, छतीरबेट, घोणसपूर व घरोशी

जावली : वहिटे, बाहुले, भूतेघर व बोंडरवाडी

पाटण : निगडे, कठनी, घोटील, जिंती व उमरकांचन

कऱ्हाड : जुझारवाडी

(चौकट)

१२ खांब उभे करून केळघर वाहिनी सुरू

अतिवृष्टीमुळे मेढा उपविभागातील केळघर उच्चदाब वाहिनीचे १२ खांब पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १२ गावांचा वीजपुरवठा ठप्प झालेला. मंगळवारी वीज कर्मचारी व व स्थानिक ठेकेदारांच्या कामगारांनी खांद्यावर कावड करून खांब वाहून नेले. सर्व अडचणींवर मात करून कामगारांनी १२ खांब उभे केले. यानंतर केळघर, केडंबे, नांदघणे, वरोशी, पुनवडी, डांगरेघर, कुरुळोशी, धावली, तळोशी, वाळंजवाडी, वाटंबे, मुकवली, या गावांतील एकूण ७२८ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

फोटो : २८ एमएसईबी फोटो

वीज कर्मचाऱ्यांनी केळघर वाहिनीचे खांब खांद्यावर वाहून नेऊन केळघर विभागातील बारा गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला.