शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

सातारा अन् कऱ्हाड तालुक्यात कोरोनाच्या ४० टक्के रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष झाले असून आतापर्यंत ८२ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष झाले असून आतापर्यंत ८२ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १९ हजार रुग्ण सातारा तालुक्यात तर कऱ्हाडमध्ये १३ हजारांवर स्पष्ट झाले आहेत. या दोन्ही तालुक्यांत बाधित आढळण्याचे प्रमाण ३९.८३ टक्के आहे. तर २०९२ मृत्यूपैकी ८९० हे या दोनच तालुक्यांतील आहेत. टक्केवारीत हे प्रमाण ४२.५४ आहे. या दोन्ही तालुक्यांतील रुग्ण आणि मृतांची टक्केवारी धडकी भरविणारी आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचे रुग्ण दररोज ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून आले. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णात हळू-हळू वाढ होत गेली. मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्यावर्षी एकदाच १ हजाराच्यावर रुग्णसंख्या पोहोचली होती. मात्र, सध्या १ हजाराच्यावर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

मागील दोन महिन्यांचा विचार करता फेब्रुवारीत २४९१ नवीन रुग्ण समोर आले होते. जानेवारीच्या तुलनेत ११०० रुग्णांची वाढ झाली होती. तर ३६ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. मृतांचा आकडाही १० ने वाढला होता. त्याचबरोबर फेब्रुवारीपेक्षा मार्च महिन्यात बाधित वेगाने वाढले. कारण, एका महिन्यात ६५४८ बाधित सापडले तर ५१ जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीचा विचार करता मार्च महिन्यात २४९० बाधित वाढले. तर मृतांची संख्या १५ ने वाढली.

एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर तर बाधितांचा आकडा १५ हजारांनी वाढला आहे. ही वाढ धक्कादायक आहे. कारण, गेल्या काही दिवसांत तर दिवसाला १ हजारांवर रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ ही एप्रिलमध्येच नोंद झाली आहे. तर २०० हून अधिक जणांचा बळी एप्रिलमध्ये कोरोनाने गेला आहे. ही आकडेवारी गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. त्यातच सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात कोरोना बाधितांची नोंद आतापर्यंत ३३ हजारांजवळ पोहोचली आहे. म्हणजे आतापर्यंत रुग्ण सापडले, त्यामधील जवळपास ४० टक्के बाधित हे या दोन तालुक्यांतीलच आहेत. तसेच या दोन तालुक्यांतच कोरोना मृतांचा आकडाही विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे हे दोन तालुके कोरोना विस्फोटाचे प्रमुख केंद्र बनल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी

तालुका बाधित मृत

सातारा - १९२३८ ५२७

कऱ्हाड - १३४०५ ३६३

फलटण - १००११ २१३

कोरेगाव - ७०७१ १८२

वाई - ६०९८ १६७

खटाव - ६५४३ १७६

खंडाळा - ५०२५ ८७

जावळी - ३६८८ ८१

माण - ४५६९ १३७

पाटण - ३२०३ १२७

महाबळेश्वर - २६७७ ३२

इतर - ४२६ ००

.....................................................