शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

माणमधील ३८ बंधाऱ्यांची चौकशी व्हावी

By admin | Updated: March 31, 2016 00:07 IST

जयकुमार गोरे : पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी; ३२ लाखांचे डिझेल; ५०० मीटर नदीचे रुंदीकरण

सातारा : ‘१२५ मीटर अंतरातच तीन-तीन सिमेंट बंधारे उभारले जात आहेत. एका बंधाऱ्याचे पाणी दुसऱ्या नव्हे तर तिसऱ्याही बंधाऱ्याला लागते. ओढ्याच्या अर्ध्या पात्रात बंधारा उभारला जातो. तर अर्धे पात्र रिकामेच ठेवले जाते. ३२ लाखांचे डिझेल वापरून ५०० मीटर नदीचे रुंदीकरण केले जाते हे गणितच समजत नाही. या प्रकारच्या अनागोंदी कारभाराची तसेच मतदारसंघातील ३८ निकृष्ठ बंधाऱ्यांच्या कामांची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली.विधिमंडळात सुरू असलेल्या अधिवेशनात सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत आ. गोरे म्हणाले, ‘विदर्भ, मराठवाड्यावर होतो तसाच पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या दुष्काळी तालुक्यांच्या पट्ट्यावरही मोठा अन्याय होतो. आमच्या भागातील अंतिम टप्प्यात असणाऱ्या पाणी योजनांना सरकारने निधी दिलाच पाहिजे,’ अशी जोरदार मागणी आ. जयकुमार गोरे यांनी केली. अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना भुलवायचे, झुलवायचे आणि त्यांच्या जीवनाशी खेळण्याचे काम केले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची आकडेवारी फसवी असून, बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे.आ. जयकुमार गोरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार योजना चांगली आहे. त्या योजनेतून कामेही झाली पाहिजेत. अशा जलसंधारण कामांची सुरुवात माझ्याच मतदारसंघातून झाली होती. मात्र या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारात घेणे गरजेचे आहे. आज जिल्हाधिकारी जलयुक्तच्या कामातून इतके पाणी साठले, तितके पाणी साठले असे सांगतात. पाऊस पडल्यावरच खरे वास्तव समोर येणार आहे.जलयुक्तमधील कामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदारांना देण्यात आले आहेत. दुसऱ्या भागातील तहसीलदार माझ्या मतदारसंघात काम करतात. त्यांना ओढा कुठे, नदी कुठे आहे हे माहीत नाही. ते कामाची निवड काय करणार? स्थानिक स्तरचे पाच अधिकारी जिल्ह्यातील कामांचा आराखडा तयार करतात. त्यांनाही काही माहीत नसते. प्रत्यक्ष पाहणी होत नसल्यानेच चुकीची कामे होत आहेत. (प्रतिनिधी)दुष्काळी तालुक्यातील योजनांना निधी द्यावा...‘या सरकारने शेतकऱ्यांना भुलवायचे, झुलवायचे आणि त्यांच्या जीवनाशी खेळण्याचे काम केले आहे. वर्षात ३५०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि तुम्ही शेतकरी स्वाभिमानी वर्ष साजरे करत आहात. शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून, चारा टंचाईमुळे स्थलांतर होत आहे. शेतीमालाला, दुधाला दर नाही आणि तुम्ही वेगळेच चित्र निर्माण करत आहात. शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही? असा प्रश्न मला पडला आहे.विदर्भावर होतो तसचा आमच्या दुष्काळी भागातील तालुक्यावर अन्याय होतो. पाठीमागच्या सरकारने चांगले प्रयत्न करून आमच्या पाणीयोजनांना निधी दिला होता. आता अंतिम टप्प्यात असणाऱ्या माण-खटावसह दुष्काळी तालुक्यातील योजनांना या सरकारने निधी द्यावा,’ अशी मागणीही आमदार गोरे यांनी केली.