शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

वनविभागाच्या पथकावर हल्ला करणाऱ्या ३५ जणांवर गुन्हा

By admin | Updated: December 2, 2015 00:41 IST

महाबळेश्वर : वनरक्षक, वनपाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

महाबळेश्वर : देवळीमुरा येथे गव्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर २६ नोव्हेंबर रोजी हल्ला करणारे ३० ते ३५ जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना नागपूर यांनी या प्रकरणाचा निषेघ केला असून, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाने केली आहे.येथून १६ किलोमीटर अंतरावर २०१४ मध्ये देवळी मुरा गावातील काही ग्रामस्थांनी वन विभागात केलेले अतिक्रमण धडक कारवाई करून काढले होते. या कारवाईमुळे गावात वनविभागाबाबत संताप होता. २६ नोव्हेंबर रोजी गव्याच्या हल्ल्यात येथील स्थानिक शेतकरी अख्तर शारवान (वय ४३) हे ठार झाले होते. या हल्ल्याचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे पथक गेले होते. अतिक्रमणाचा राग असलेल्या ग्रामस्थांनी संगनमत करून पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पथकावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक मलक, राहुल निकम, रोहित लोहार, विशाल पाटील, महादेव केंद्रे हे वनविभागाचे कर्मचारी जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यांनाही जमावाने बेदम मारहाण केली होती. कुलकर्णी यांच्या वाहनांची मोडतोड करून ते पेटवून देण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता. कर्मचाऱ्यांच्यावर दबाव आणून त्यांना धमकीही देण्यात आली. या संदर्भात वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यंनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, महाबळेश्वर पोलिसांनी अज्ञात ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी पोलीस आरोपींचा शोध घेत असल्यानेशहरात एकच खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)