शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरला ३४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत असून रविवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत असून रविवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर कोयना व नवजा भागात उघडीप होती. त्याचबरोबर पूर्व भागात अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मागील २० दिवसांपूर्वी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने सध्या दडी मारली आहे. त्यामुळे अनेक भागात खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे, तर पश्चिम भागातही तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा १ मिलिमीटर पाऊस पडला. तर जूनपासून ९२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला २ तर या वर्षी आतापर्यंत १०९१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत ३४ तर जूनपासून १२८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.२२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता, तर २८४२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच पूर्व भागात ढगाळ वातावरण कायम आहे.

पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. पण, भात लागणीसाठी पावसाची आवश्यकता आहे. पूर्व भागात अनेक शेतकऱ्यांनी थोड्या ओलीवर खरीपची पेरणी केली. पण, पीकवाढीसाठी पाऊस आवश्यक आहे. तसेच काही शेतकरी पावसावर विसंबून असल्याने पेरणी रखडली आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पेरणी होऊ शकते.

.......................................................