शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

१२ दिवसात ३३ कोटींचे उद्दिष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST

सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १२ दिवस उरले असून, पालिकेने कर वसुलीचा अजून निम्मा पल्लाही गाठलेला नाही. मालमत्ता ...

सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १२ दिवस उरले असून, पालिकेने कर वसुलीचा अजून निम्मा पल्लाही गाठलेला नाही. मालमत्ता व पाणीकराचे मिळून ४४ कोटी ८६ लाख रुपये पालिकेला वसूल करावयाचे आहेत. यापैकी केवळ १२ कोटी ८ लाख ६४ हजार रुपये वसूल झाले असून, उरलेल्या दिवसात प्रशासन ३३ कोटींच्या थकबाकीचे उद्दिष्ट कसे गाठणार? हा प्रश्नच आहे.

पालिकेच्या हद्दीत तब्बल ३६ हजार मिळकती आहेत. हद्दवाढीमुळे मिळकतींमध्ये आणखी २५ हजारांची भर पडली आहे. मात्र अद्याप वाढीव भागातील मिळकतींना पालिकेची करप्रणाली लागू झालेली नाही. सद्य:स्थितीत पालिकेकडून निवासी मिळकतींची तीन तर व्यावसायिक मिळकतींची सहा रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे कर आकारणी केली जाते. पालिकेच्या वसुली विभागाने कर वसुलीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. शिवाय पालिकेच्या जप्ती पथकाकडूनही शहरात मोहीम राबविली जात आहे. जप्तीची नोटीस हातात पडल्याने काही थकबाकीदारांनी स्वत: पालिकेत येऊन कराचा भरणा केला. मात्र नागरिकांनी अद्यापही कर भरण्याकडे पाठ फिरविल्याचे वसुलीच्या आकाड्यांवरून दिसून येते.

पालिकेला एकूण ४४ कोटी ८६ लाख ६४ हजार ७३३ रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ १२ कोटी ८ लाख ६४ हजार ३२८ रुपये आजवर वसूल झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १२ दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत पालिकेला अजून ३२ कोटी ९३ लाख २८ हजार ८३१ रुपये वसूल करावे लागणार आहे. सध्या पालिकेच्या तिजोरीत दररोज २ ते ४ लाखांची भर पडत आहे. ही वसुली पाहता करवसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटत आहे.

(चौकट)

पाणीपट्टीच्या थकबाकीचा विषय गंभीर

सातारा पालिकेला पाणी करापोटी तब्बल ९ कोटी ४२ लाख ९९ हजार ९३० रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी गेल्या सात ते आठ महिन्यात केवळ २ कोटी ४६ लाख ५२ हजार ८१ रुपये वसूल झाले आहेत. येत्या दहा-बारा दिवसात पाणीपट्टीची थकबाकी प्रशासन कशी वसूल करणार याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पाणी व घरपट्टी कर पालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र नागरिकांकडून कर वेळेवर भरला जात नसल्याने प्रशासन आर्थिक संकटात येऊ शकते. त्यामुळे थकबाकीदारांविरुद्ध आता प्रशासनालाच कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

लोगो : सातारा पालिकेचा फोटो