शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

३२ फूट खोलीचा तलाव अवघ्या पाच फुटांवर!

By admin | Updated: August 12, 2016 00:06 IST

शासनाचे दुर्लक्ष : ब्रिटिशकालीन तलाव, पाटाचीही दुरवस्था

मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलाव १२५ वर्षांकडे वाटचाल करत असला तरी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. प्रारंभी ३२ फूट खोली असणारा तलाव सध्या केवळ ५ फुटांवर आला असून, या तलावातून शेती पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाटाचीही दुरवस्था झाली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील डोंगर उतारावर मायणी येथे ब्रिटिशांनी तलावाची बांधणी केली. या तलावाच्या कामाला कधी सुरुवात झाली हे निश्चित सांगता येत नाही; पण १८९६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १८९६ मध्ये हे काम सुरू होते याची नोंद चांगदेव खैरमोडे यांच्या चरित्र ग्रंथात आहे. याकाळी ५०० एकरांत ३२ फूट खोलीचे या तलावाचे बांधकाम १९०० साली पूर्ण झाले. त्यावेळी जुना सातारा जिल्हा अस्तित्वात होता. त्यावेळी मायणी, माहुली, चिखळहोळ आदी भागांतील क्षेत्र ओलिताखाली येत होते. यासाठी तलावाच्या सांडव्याच्या बाजूस असलेल्या दगडी भिंतीच्या प्रारंभीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता. त्या दरवाजातून पाटाचे पाणी शेतीला दिले जात होते. त्यामुळे या पाटाच्या दोन्ही बाजूस सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंत काळीभोर सुपीक जमीन आहे.जर या तलावातील गाळ काढला तर मायणी व परिसरातील शेत जमिनीचा कायमचा पाणी प्रश्न मिटेल तसेच याच तलावावरील भागातून (पूर्व-दक्षिण) टेंभू योजनेचा कॅनॉल सोलापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून जात आहे.या पाटातून नैसर्गिंक उतारानेही पाणी तलावात येऊ शकत असल्याचे त्याच्या रचनेवरून वाटते.जर तलावात पाणी आले तर सातारा जिल्ह्यातील मायणी, चितळी, कलेढोण आदी भागांसह सांगली जिल्ह्यातील माहुली, चिखळहोळ आदी भागांचा शेतीपाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. (वार्ताहर)