शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

३२ फूट खोलीचा तलाव अवघ्या पाच फुटांवर!

By admin | Updated: August 12, 2016 00:06 IST

शासनाचे दुर्लक्ष : ब्रिटिशकालीन तलाव, पाटाचीही दुरवस्था

मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलाव १२५ वर्षांकडे वाटचाल करत असला तरी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. प्रारंभी ३२ फूट खोली असणारा तलाव सध्या केवळ ५ फुटांवर आला असून, या तलावातून शेती पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाटाचीही दुरवस्था झाली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील डोंगर उतारावर मायणी येथे ब्रिटिशांनी तलावाची बांधणी केली. या तलावाच्या कामाला कधी सुरुवात झाली हे निश्चित सांगता येत नाही; पण १८९६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १८९६ मध्ये हे काम सुरू होते याची नोंद चांगदेव खैरमोडे यांच्या चरित्र ग्रंथात आहे. याकाळी ५०० एकरांत ३२ फूट खोलीचे या तलावाचे बांधकाम १९०० साली पूर्ण झाले. त्यावेळी जुना सातारा जिल्हा अस्तित्वात होता. त्यावेळी मायणी, माहुली, चिखळहोळ आदी भागांतील क्षेत्र ओलिताखाली येत होते. यासाठी तलावाच्या सांडव्याच्या बाजूस असलेल्या दगडी भिंतीच्या प्रारंभीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता. त्या दरवाजातून पाटाचे पाणी शेतीला दिले जात होते. त्यामुळे या पाटाच्या दोन्ही बाजूस सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंत काळीभोर सुपीक जमीन आहे.जर या तलावातील गाळ काढला तर मायणी व परिसरातील शेत जमिनीचा कायमचा पाणी प्रश्न मिटेल तसेच याच तलावावरील भागातून (पूर्व-दक्षिण) टेंभू योजनेचा कॅनॉल सोलापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून जात आहे.या पाटातून नैसर्गिंक उतारानेही पाणी तलावात येऊ शकत असल्याचे त्याच्या रचनेवरून वाटते.जर तलावात पाणी आले तर सातारा जिल्ह्यातील मायणी, चितळी, कलेढोण आदी भागांसह सांगली जिल्ह्यातील माहुली, चिखळहोळ आदी भागांचा शेतीपाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. (वार्ताहर)