शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सातारा जिल्ह्यात २८ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८८१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २८ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृत्युमुखी यांची संख्या ...

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८८१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २८ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृत्युमुखी यांची संख्या चार हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे.

सातारा, कऱ्हाड, खंडाळा, खटाव या तालुक्यांमध्ये अजूनही शंभराच्या वर रुग्ण आढळत आहेत. या चार तालुक्यांमध्ये प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वतः गुरुवारी खटाव तालुक्यातील कोरोना परिस्थितीची पाहणी केली. तसेच स्थानिक प्रशासनाला संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या. महाबळेश्वर तालुक्यांमध्ये गुरुवारी अवघे दोन रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरातील कोरोनाचा फैलाव थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ८ हजार २३२ इतकी झाली असून कोरोनामुळे ३ हजार ९६८ बाधितांना जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी गेलेल्या २८ बळीपैकी अकरा बळी हे एका कऱ्हाड तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत १ हजार ४५३ नागरिकांना घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात एकूण ८ लाख ८९ हजार १८२ तपासण्या करण्यात आल्या. तसेच १ लाख ६३ हजार ४३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात विविध ठिकाणी १० हजार ७७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

चौकट

सातारा तालुक्यातील बाधितांचे संख्या ३७ हजारांच्या वर

सातारा तालुक्यात बाधित यांची संख्या सर्वात जास्त आहे. गुरुवारअखेर तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या ३७ हजार ३४९ इतकी झाली असून तालुक्यात आतापर्यंत १ हजार १२९ इतक्या रुग्णांनी जीव गमावले आहेत.