शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन महिन्यांत २८ आत्महत्या; प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा ...

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या. त्या पूर्ण करताना होणारी दमछाक, अपेक्षापूर्ती न झाल्याने माणसांमध्ये नैराश्याची भावना वाढत जाऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये सुमारे २६८ जणांनी आत्महत्या केल्या, तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्र बंद पडल्याने अनेक उद्योग बंद पडले. नोकऱ्या गेल्या. आर्थिक नुकसान झाले. जवळचे कोरोनाने दगावल्याने माणसे व्यसनाधीन झाली. परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वतःला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मक विचार मनात येऊ लागले. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या.

जिल्ह्यात २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण थोडेफार घटले. या वर्षात माणसाला कोरोनाने घेरले. त्यातून वर्षभरात सुमारे १७३ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या प्रारंभीच्या कालावधीत अनेक जण स्वतःला सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले; पण गतवर्षीचा अनुभव पाहता आता हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही. सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे गत दोन वर्षांतील आत्महत्येचे सरासरी प्रमाण गत तीन महिन्यांत कोरोनाच्या संकटामुळे आत्महत्येचे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्च २०२१ अखेरपर्यंत २८ जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे.

कोट:

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही, तर सारेच अडचणीत आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात सध्या निर्माण होत आहे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून लोक मार्ग काढत आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये मानसोपचार तज्ज्ञ अथवा समुपदेशकाकडून उपचार घेणे, कौटुंबिक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.

डॉ. एच. डी. पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सातारा

चौकट :

कोरोना संकटात तेरा आत्महत्या

जिल्ह्यात कोरोनाचे संकट महाभयंकर ओढावले आहे. सारेजण संकटात सापडले आहेत; पण गत वर्षभरापासून आर्थिक नुकसानीत पुन्हा उभे राहण्याची उमेद संपल्याच्या नैराश्यातून जिल्ह्यात ११ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय इतरही आत्महत्या झाल्या; पण त्यासाठी ठोस कारण पोलिसांच्या दप्तरी नोंद नाही.

चौकट :

२०१९ ला झालेल्या आत्महत्या २६८

२०२०- १७३

२०२१ जानेवारी ते मार्च - २८