शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

जिल्ह्यात तीन महिन्यांत २८ आत्महत्या; प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा ...

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या. त्या पूर्ण करताना होणारी दमछाक, अपेक्षापूर्ती न झाल्याने माणसांमध्ये नैराश्याची भावना वाढत जाऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये सुमारे २६८ जणांनी आत्महत्या केल्या, तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्र बंद पडल्याने अनेक उद्योग बंद पडले. नोकऱ्या गेल्या. आर्थिक नुकसान झाले. जवळचे कोरोनाने दगावल्याने माणसे व्यसनाधीन झाली. परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वतःला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मक विचार मनात येऊ लागले. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या.

जिल्ह्यात २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण थोडेफार घटले. या वर्षात माणसाला कोरोनाने घेरले. त्यातून वर्षभरात सुमारे १७३ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या प्रारंभीच्या कालावधीत अनेक जण स्वतःला सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले; पण गतवर्षीचा अनुभव पाहता आता हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही. सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे गत दोन वर्षांतील आत्महत्येचे सरासरी प्रमाण गत तीन महिन्यांत कोरोनाच्या संकटामुळे आत्महत्येचे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्च २०२१ अखेरपर्यंत २८ जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे.

कोट:

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही, तर सारेच अडचणीत आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात सध्या निर्माण होत आहे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून लोक मार्ग काढत आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये मानसोपचार तज्ज्ञ अथवा समुपदेशकाकडून उपचार घेणे, कौटुंबिक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.

डॉ. एच. डी. पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सातारा

चौकट :

कोरोना संकटात तेरा आत्महत्या

जिल्ह्यात कोरोनाचे संकट महाभयंकर ओढावले आहे. सारेजण संकटात सापडले आहेत; पण गत वर्षभरापासून आर्थिक नुकसानीत पुन्हा उभे राहण्याची उमेद संपल्याच्या नैराश्यातून जिल्ह्यात ११ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय इतरही आत्महत्या झाल्या; पण त्यासाठी ठोस कारण पोलिसांच्या दप्तरी नोंद नाही.

चौकट :

२०१९ ला झालेल्या आत्महत्या २६८

२०२०- १७३

२०२१ जानेवारी ते मार्च - २८