शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अपघातात 25 नवीन दुचाकी जळून खाक, कोटींचे नुकसान

By admin | Updated: May 11, 2017 13:18 IST

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साता-यातील भरतगाव येथे कंटेनर आणि कारची धडक झाली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांना आग लागली व कंटेनरमधील नवीन 25 दुचाकी जळून खाक झाल्या.

ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 11  - पुणे-बंगळुरू  राष्ट्रीय महामार्गावर साता-यातील भरतगाव येथे कंटेनर आणि कारची धडक झाली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांना आग लागली. यामुळे कंटेनरमधील नवीन 25 दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेत जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी (11 मे) सकाळी झाला.
 
पुण्याहून कंटेनर कोल्हापूरकडे निघाला होता. या कंटनेरमध्ये सुमारे 25 दुचाकी होत्या. भरतगावाजवळ आल्यानंतर कार आणि कंटेनरची धडक झाली. धडकेनंतर  दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आग लागल्याचे निदर्शनास येताच कार आणि कंटेनरमधील चालकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारल्या. सुदैवानं दोघंही बचावले.  
 
काहीक्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. पाहता-पाहता कंटेनर, कार आणि कंटेनरमधील सर्व दुचाकी अक्षरश: जळून खाक झाल्या. या अपघातामुळे महामार्गावर अग्नितांडव निर्माण झाले होते. 
 
अखेर काही वेळानंतर  सातारा पालिका आणि शेंद्रे येथील अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत कार, कंटेनर आणि कंटेनरमधील दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.