शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

बसअभावी प्रवाशांची २५ किलोमीटर पायपीट

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

सत्तावीस गावांचा प्रश्न : ‘बांधकाम विभाग-एसटी’च्या आडमुठेपणामुळे ठोसेघर पठारावरील विद्यार्थ्यांचे नुकसान

परळी : पावसाळ्यात ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजून वाहतूक सुरळीत सुरू आहे; परंतु बांधकाम विभागाने महिनाभर तरी या मार्गावरून वाहतूक करू नये, असे सांगितल्यामुळे बस सज्जनगड फाट्यापर्यंतच जाते. यामुळे २७ गावांतील लोकांना तेथून पुढे सुमारे २५ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे दरीकडील बाजूचा रस्ता खचला होता. त्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूने वाहतूक सुरू असून सहलीच्या ट्रॅव्हल्स, पवनचक्की कंपनीचे कंटेनर, इतर वाहनांची ये-जा सुरू आहे. परंतु बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला येथील वाहतूक धोकादायक आहे, त्यामुळे या मार्गावरून महिनाभर तरी वाहतूक करू नये, असे लेखी पत्र दिल्याने एसटीचे अधिकारी धोका पत्करण्यास नकार देतात. वारंवार भेटून, सूचना देऊनही त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या दहा फेऱ्या होतात. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने मोरेवाडी व जांभे अशा दोन मुक्कामी बसेस जातात. दुपारच्या वेळेत सर्व बसेस सज्जनगड फाट्यापर्यंत येतात. त्यामुळे प्रवाशांना तेथून पुढे जाण्यासाठी बसची सोय नसल्यामुळे सुमारे २५ किलोमीटर चालत जावे लागते. दोन्ही विभागांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)बांधकाम विभागाचे अजब उत्तरया मार्गावरून इतर वाहने ये-जा करतात मग एसटी बस का येत नाही, अशी विचारणा केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वाहनांचा अपघात झाल्यास ती आमची जबाबदारी असते आणि इतर वाहनांचा अपघात झाल्यास त्यात आमचा काहीही दोष नाही, असे अजब उत्तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकढून ऐकावयास मिळते.बस चुकल्यास स्टॅण्डवर मुक्कामठोसेघर पठारावरील सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात. काही जण शहरात नोकरी करतात. ते मुक्कामी बसने जातात. मात्र, काहीवेळेला मुक्कामी बस उशिरा येते. त्यामुळे अनेकांना बसस्थानकावरच मुक्काम करावा लागतो.तहसीलदारांचे पोकळ आश्वासनपठारावर याच रस्त्याने मुक्कामी बसेस येतात. मग सकाळच्या का येऊ शकत नाहीत, अशी तक्रार तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी दि. ३० डिसेंबरला केली होती. त्यावेळी दोन दिवसांत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.बांधकाम विभागाने लेखी पत्र दिल्यामुळे आम्ही बससेवा बंद केली आहे. त्यांनी बस सुरू करण्याबाबत लेखी द्यावे, असे एसटी मंहामंडळाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे दोन्ही विभागांच्या आडमुठेपणामुळे २७ गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.- हणमंत पवार, ग्रामस्थ