शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

बसअभावी प्रवाशांची २५ किलोमीटर पायपीट

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

सत्तावीस गावांचा प्रश्न : ‘बांधकाम विभाग-एसटी’च्या आडमुठेपणामुळे ठोसेघर पठारावरील विद्यार्थ्यांचे नुकसान

परळी : पावसाळ्यात ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजून वाहतूक सुरळीत सुरू आहे; परंतु बांधकाम विभागाने महिनाभर तरी या मार्गावरून वाहतूक करू नये, असे सांगितल्यामुळे बस सज्जनगड फाट्यापर्यंतच जाते. यामुळे २७ गावांतील लोकांना तेथून पुढे सुमारे २५ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे दरीकडील बाजूचा रस्ता खचला होता. त्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूने वाहतूक सुरू असून सहलीच्या ट्रॅव्हल्स, पवनचक्की कंपनीचे कंटेनर, इतर वाहनांची ये-जा सुरू आहे. परंतु बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला येथील वाहतूक धोकादायक आहे, त्यामुळे या मार्गावरून महिनाभर तरी वाहतूक करू नये, असे लेखी पत्र दिल्याने एसटीचे अधिकारी धोका पत्करण्यास नकार देतात. वारंवार भेटून, सूचना देऊनही त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या दहा फेऱ्या होतात. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने मोरेवाडी व जांभे अशा दोन मुक्कामी बसेस जातात. दुपारच्या वेळेत सर्व बसेस सज्जनगड फाट्यापर्यंत येतात. त्यामुळे प्रवाशांना तेथून पुढे जाण्यासाठी बसची सोय नसल्यामुळे सुमारे २५ किलोमीटर चालत जावे लागते. दोन्ही विभागांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)बांधकाम विभागाचे अजब उत्तरया मार्गावरून इतर वाहने ये-जा करतात मग एसटी बस का येत नाही, अशी विचारणा केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वाहनांचा अपघात झाल्यास ती आमची जबाबदारी असते आणि इतर वाहनांचा अपघात झाल्यास त्यात आमचा काहीही दोष नाही, असे अजब उत्तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकढून ऐकावयास मिळते.बस चुकल्यास स्टॅण्डवर मुक्कामठोसेघर पठारावरील सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात. काही जण शहरात नोकरी करतात. ते मुक्कामी बसने जातात. मात्र, काहीवेळेला मुक्कामी बस उशिरा येते. त्यामुळे अनेकांना बसस्थानकावरच मुक्काम करावा लागतो.तहसीलदारांचे पोकळ आश्वासनपठारावर याच रस्त्याने मुक्कामी बसेस येतात. मग सकाळच्या का येऊ शकत नाहीत, अशी तक्रार तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी दि. ३० डिसेंबरला केली होती. त्यावेळी दोन दिवसांत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.बांधकाम विभागाने लेखी पत्र दिल्यामुळे आम्ही बससेवा बंद केली आहे. त्यांनी बस सुरू करण्याबाबत लेखी द्यावे, असे एसटी मंहामंडळाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे दोन्ही विभागांच्या आडमुठेपणामुळे २७ गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.- हणमंत पवार, ग्रामस्थ