शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बसअभावी प्रवाशांची २५ किलोमीटर पायपीट

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

सत्तावीस गावांचा प्रश्न : ‘बांधकाम विभाग-एसटी’च्या आडमुठेपणामुळे ठोसेघर पठारावरील विद्यार्थ्यांचे नुकसान

परळी : पावसाळ्यात ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजून वाहतूक सुरळीत सुरू आहे; परंतु बांधकाम विभागाने महिनाभर तरी या मार्गावरून वाहतूक करू नये, असे सांगितल्यामुळे बस सज्जनगड फाट्यापर्यंतच जाते. यामुळे २७ गावांतील लोकांना तेथून पुढे सुमारे २५ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे दरीकडील बाजूचा रस्ता खचला होता. त्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूने वाहतूक सुरू असून सहलीच्या ट्रॅव्हल्स, पवनचक्की कंपनीचे कंटेनर, इतर वाहनांची ये-जा सुरू आहे. परंतु बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला येथील वाहतूक धोकादायक आहे, त्यामुळे या मार्गावरून महिनाभर तरी वाहतूक करू नये, असे लेखी पत्र दिल्याने एसटीचे अधिकारी धोका पत्करण्यास नकार देतात. वारंवार भेटून, सूचना देऊनही त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या दहा फेऱ्या होतात. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने मोरेवाडी व जांभे अशा दोन मुक्कामी बसेस जातात. दुपारच्या वेळेत सर्व बसेस सज्जनगड फाट्यापर्यंत येतात. त्यामुळे प्रवाशांना तेथून पुढे जाण्यासाठी बसची सोय नसल्यामुळे सुमारे २५ किलोमीटर चालत जावे लागते. दोन्ही विभागांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)बांधकाम विभागाचे अजब उत्तरया मार्गावरून इतर वाहने ये-जा करतात मग एसटी बस का येत नाही, अशी विचारणा केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वाहनांचा अपघात झाल्यास ती आमची जबाबदारी असते आणि इतर वाहनांचा अपघात झाल्यास त्यात आमचा काहीही दोष नाही, असे अजब उत्तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकढून ऐकावयास मिळते.बस चुकल्यास स्टॅण्डवर मुक्कामठोसेघर पठारावरील सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात. काही जण शहरात नोकरी करतात. ते मुक्कामी बसने जातात. मात्र, काहीवेळेला मुक्कामी बस उशिरा येते. त्यामुळे अनेकांना बसस्थानकावरच मुक्काम करावा लागतो.तहसीलदारांचे पोकळ आश्वासनपठारावर याच रस्त्याने मुक्कामी बसेस येतात. मग सकाळच्या का येऊ शकत नाहीत, अशी तक्रार तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी दि. ३० डिसेंबरला केली होती. त्यावेळी दोन दिवसांत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.बांधकाम विभागाने लेखी पत्र दिल्यामुळे आम्ही बससेवा बंद केली आहे. त्यांनी बस सुरू करण्याबाबत लेखी द्यावे, असे एसटी मंहामंडळाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे दोन्ही विभागांच्या आडमुठेपणामुळे २७ गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.- हणमंत पवार, ग्रामस्थ