शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

बसअभावी प्रवाशांची २५ किलोमीटर पायपीट

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

सत्तावीस गावांचा प्रश्न : ‘बांधकाम विभाग-एसटी’च्या आडमुठेपणामुळे ठोसेघर पठारावरील विद्यार्थ्यांचे नुकसान

परळी : पावसाळ्यात ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजून वाहतूक सुरळीत सुरू आहे; परंतु बांधकाम विभागाने महिनाभर तरी या मार्गावरून वाहतूक करू नये, असे सांगितल्यामुळे बस सज्जनगड फाट्यापर्यंतच जाते. यामुळे २७ गावांतील लोकांना तेथून पुढे सुमारे २५ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे दरीकडील बाजूचा रस्ता खचला होता. त्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूने वाहतूक सुरू असून सहलीच्या ट्रॅव्हल्स, पवनचक्की कंपनीचे कंटेनर, इतर वाहनांची ये-जा सुरू आहे. परंतु बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला येथील वाहतूक धोकादायक आहे, त्यामुळे या मार्गावरून महिनाभर तरी वाहतूक करू नये, असे लेखी पत्र दिल्याने एसटीचे अधिकारी धोका पत्करण्यास नकार देतात. वारंवार भेटून, सूचना देऊनही त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या दहा फेऱ्या होतात. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने मोरेवाडी व जांभे अशा दोन मुक्कामी बसेस जातात. दुपारच्या वेळेत सर्व बसेस सज्जनगड फाट्यापर्यंत येतात. त्यामुळे प्रवाशांना तेथून पुढे जाण्यासाठी बसची सोय नसल्यामुळे सुमारे २५ किलोमीटर चालत जावे लागते. दोन्ही विभागांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)बांधकाम विभागाचे अजब उत्तरया मार्गावरून इतर वाहने ये-जा करतात मग एसटी बस का येत नाही, अशी विचारणा केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वाहनांचा अपघात झाल्यास ती आमची जबाबदारी असते आणि इतर वाहनांचा अपघात झाल्यास त्यात आमचा काहीही दोष नाही, असे अजब उत्तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकढून ऐकावयास मिळते.बस चुकल्यास स्टॅण्डवर मुक्कामठोसेघर पठारावरील सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात. काही जण शहरात नोकरी करतात. ते मुक्कामी बसने जातात. मात्र, काहीवेळेला मुक्कामी बस उशिरा येते. त्यामुळे अनेकांना बसस्थानकावरच मुक्काम करावा लागतो.तहसीलदारांचे पोकळ आश्वासनपठारावर याच रस्त्याने मुक्कामी बसेस येतात. मग सकाळच्या का येऊ शकत नाहीत, अशी तक्रार तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी दि. ३० डिसेंबरला केली होती. त्यावेळी दोन दिवसांत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.बांधकाम विभागाने लेखी पत्र दिल्यामुळे आम्ही बससेवा बंद केली आहे. त्यांनी बस सुरू करण्याबाबत लेखी द्यावे, असे एसटी मंहामंडळाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे दोन्ही विभागांच्या आडमुठेपणामुळे २७ गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.- हणमंत पवार, ग्रामस्थ