शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

६५ किलोमीटरमध्ये २५ ‘उड्डाणे’!

By admin | Updated: June 28, 2015 00:31 IST

१५ उड्डाणपूल पूर्ण : उर्वरित पुलांना नोव्हेंबरपर्यंत ‘डेडलाईन’

दत्ता यादव ल्ल सातारा सातारा : लोकसंख्या आणि वाहनांची संख्या दिवसागणीक वाढत चालली आहे. त्यामुळे वेळेची बचत आणि नागरिकांचा सुखर प्रवास व्हावा, या हेतूने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेंद्रे ते शिरवळ या ६५ किलोमीटर अंतराच्या महामार्गावर तब्बल २५ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून १५ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी सोडविण्यातच प्रशासनाची अक्षरश: दमछाक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १९९५ पूर्वी दुपदरी रस्त्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी सुरूवातीच्या काळातच नागरिकांकडून मोठा विरोध झाला होता. परंतु प्रशासनाने टप्प्याटप्प्याने यामध्ये तोडगा काढून महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरूच ठेवले. हे काम पूर्ण होताच पुन्हा चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २०१० पर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर २०१० पासून महामार्गाच्या सहापदरीकरणाला प्रारंभ झाला. महामार्ग सहापदरीकरणाची मान्यता देतानाही ठेकेदारीपद्धतीवरून प्रशासन आणि खासगी कंपनीमध्ये बराच गहजब उडाला होता. अखेर सहा सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून हे काम नेमके किती दिवस सुरू राहाणार, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे. सहापदरीकरणाचे काम होणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. रोज अपघात आणि धिम्यागतीने सुरू असलेली वाहतूक यामुळे सहापदरीचे काम जलदगतीने व्हावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या शेंद्रे ते शिरवळपर्यंत ६५ किलोमीटर अंतरात तब्बल २५ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. परंतु सध्या सहा पुलांवरून सातारा ते पुणे एकेरी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. अत्याधुनिकीकरणामुळे पुलाचे बांधकाम वेगळ्या धरतीवर करण्यात येत आहे. मुंबई, हैदराबाद आणि मध्यप्रदेशमधून चांगल्या दर्जाचे स्टील उड्डाणपुलाच्या कामासाठी मागविण्यात आले आहे. उड्डाणपुलावर कितीही वाहने उभी राहिली, तरी पुलाला धोका निर्माण होणार नाही. एक पूल हजारो टन वजन पेलू शकेल, एवढी क्षमता या नवीन बांधीव पुलामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.