शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

६५ किलोमीटरमध्ये २५ ‘उड्डाणे’!

By admin | Updated: June 28, 2015 00:31 IST

१५ उड्डाणपूल पूर्ण : उर्वरित पुलांना नोव्हेंबरपर्यंत ‘डेडलाईन’

दत्ता यादव ल्ल सातारा सातारा : लोकसंख्या आणि वाहनांची संख्या दिवसागणीक वाढत चालली आहे. त्यामुळे वेळेची बचत आणि नागरिकांचा सुखर प्रवास व्हावा, या हेतूने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेंद्रे ते शिरवळ या ६५ किलोमीटर अंतराच्या महामार्गावर तब्बल २५ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून १५ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी सोडविण्यातच प्रशासनाची अक्षरश: दमछाक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १९९५ पूर्वी दुपदरी रस्त्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी सुरूवातीच्या काळातच नागरिकांकडून मोठा विरोध झाला होता. परंतु प्रशासनाने टप्प्याटप्प्याने यामध्ये तोडगा काढून महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरूच ठेवले. हे काम पूर्ण होताच पुन्हा चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २०१० पर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर २०१० पासून महामार्गाच्या सहापदरीकरणाला प्रारंभ झाला. महामार्ग सहापदरीकरणाची मान्यता देतानाही ठेकेदारीपद्धतीवरून प्रशासन आणि खासगी कंपनीमध्ये बराच गहजब उडाला होता. अखेर सहा सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून हे काम नेमके किती दिवस सुरू राहाणार, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे. सहापदरीकरणाचे काम होणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. रोज अपघात आणि धिम्यागतीने सुरू असलेली वाहतूक यामुळे सहापदरीचे काम जलदगतीने व्हावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या शेंद्रे ते शिरवळपर्यंत ६५ किलोमीटर अंतरात तब्बल २५ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. परंतु सध्या सहा पुलांवरून सातारा ते पुणे एकेरी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. अत्याधुनिकीकरणामुळे पुलाचे बांधकाम वेगळ्या धरतीवर करण्यात येत आहे. मुंबई, हैदराबाद आणि मध्यप्रदेशमधून चांगल्या दर्जाचे स्टील उड्डाणपुलाच्या कामासाठी मागविण्यात आले आहे. उड्डाणपुलावर कितीही वाहने उभी राहिली, तरी पुलाला धोका निर्माण होणार नाही. एक पूल हजारो टन वजन पेलू शकेल, एवढी क्षमता या नवीन बांधीव पुलामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.