शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

६५ किलोमीटरमध्ये २५ ‘उड्डाणे’!

By admin | Updated: June 28, 2015 00:31 IST

१५ उड्डाणपूल पूर्ण : उर्वरित पुलांना नोव्हेंबरपर्यंत ‘डेडलाईन’

दत्ता यादव ल्ल सातारा सातारा : लोकसंख्या आणि वाहनांची संख्या दिवसागणीक वाढत चालली आहे. त्यामुळे वेळेची बचत आणि नागरिकांचा सुखर प्रवास व्हावा, या हेतूने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेंद्रे ते शिरवळ या ६५ किलोमीटर अंतराच्या महामार्गावर तब्बल २५ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून १५ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी सोडविण्यातच प्रशासनाची अक्षरश: दमछाक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १९९५ पूर्वी दुपदरी रस्त्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी सुरूवातीच्या काळातच नागरिकांकडून मोठा विरोध झाला होता. परंतु प्रशासनाने टप्प्याटप्प्याने यामध्ये तोडगा काढून महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरूच ठेवले. हे काम पूर्ण होताच पुन्हा चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २०१० पर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर २०१० पासून महामार्गाच्या सहापदरीकरणाला प्रारंभ झाला. महामार्ग सहापदरीकरणाची मान्यता देतानाही ठेकेदारीपद्धतीवरून प्रशासन आणि खासगी कंपनीमध्ये बराच गहजब उडाला होता. अखेर सहा सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून हे काम नेमके किती दिवस सुरू राहाणार, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे. सहापदरीकरणाचे काम होणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. रोज अपघात आणि धिम्यागतीने सुरू असलेली वाहतूक यामुळे सहापदरीचे काम जलदगतीने व्हावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या शेंद्रे ते शिरवळपर्यंत ६५ किलोमीटर अंतरात तब्बल २५ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. परंतु सध्या सहा पुलांवरून सातारा ते पुणे एकेरी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. अत्याधुनिकीकरणामुळे पुलाचे बांधकाम वेगळ्या धरतीवर करण्यात येत आहे. मुंबई, हैदराबाद आणि मध्यप्रदेशमधून चांगल्या दर्जाचे स्टील उड्डाणपुलाच्या कामासाठी मागविण्यात आले आहे. उड्डाणपुलावर कितीही वाहने उभी राहिली, तरी पुलाला धोका निर्माण होणार नाही. एक पूल हजारो टन वजन पेलू शकेल, एवढी क्षमता या नवीन बांधीव पुलामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.