शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

माजगावात बिबट्याच्या हल्यात २४५ देशी कोंबड्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:39 IST

चाफळ : पाळीव देशी कोंबड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासांत फडशा पाडल्याची घटना विभागातील ...

चाफळ : पाळीव देशी कोंबड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासांत फडशा पाडल्याची घटना विभागातील माजगांव ता. पाटण येथे घडली. विक्रम महिपाल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करत, संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.

चाफळसह परिसरातील गावागावांत बिबट्याचा वावर नित्याचाच ठरला आहे. वारंवार मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांना बिबट्या भक्ष्य करू लागला आहे. यात मात्र शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच अडचणी सापडलेला बळीराजा कधी अतिवृष्टीला तर कधी पशुधन धोक्यात आल्याने मेटाकुटीला आला आहे. माजगांव, चाफळसह परिसरात गत काही महिन्यांपासून बिबट्या सतत शेतकऱ्यांच्या नजरेस पडू लागला आहे. गत काही दिवसांपूर्वी चाफळ येथील लक्ष्मीनगरमध्ये थेट मानवी वस्तीत प्रवेश करत जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळी ठार मारली होती.

या घटनेनंतर बिबट्याने माजगांव येथील राममळा नावाच्या शिवारातील विक्रम महिपाल यांच्या देशी कोंबड्यांच्या शेडवर आपल्या साथीदारासोबत हल्ला चढवत शेडमधील २४५ कोंबड्यांचा चुराडा केला, तर २२ कोंबड्या जखमी अवस्थेत इतरस्त्र आढळून आल्या. यात महिपाल यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे सलून व्यवसाय बंद असल्याने महिपाल यांनी कर्जे काढून आपल्या राममळा शिवारातील शेतामध्ये शेड उभारून देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय थाटला खरा, पण बिबट्याने तो थोड्याच दिवसांत मोडून काढल्याने महिपाल यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून महिपाल यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महिपाल यांच्यासह माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.

कोट

महिपाल यांना मदत मिळवून देण्याचे वनविभागाचे आश्वासन

विक्रम महिपाल यांनी नातेवाईक व मित्रमंडळीकडून पैसे उसने घेऊन शेतात शेड उभारून देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. २६७ कोंबड्या या शेडमध्ये होत्या. यातील २४५ कोंबड्या या हल्यात मारल्या गेल्यात. या घटनेची माहिती वनविभागास माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील व महिपाल यांनी दिल्यानंतर, वनरक्षक विलास वाघमारे यांनी सदर घटनेचा पंचनामा करत महिपाल यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.