शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत सांगलीसाठी २१ टीएमसी पाणी

By admin | Updated: February 18, 2015 23:47 IST

कोयनेत समाधानकारक पाणीसाठा : १८७४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती; सध्या ८० टक्के पाणीसाठा शिल्लक

अरुण पवार - पाटण -जलविद्युत निर्मितीचा अखंड स्त्रोत असणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर एक जुलैपासून आजअखेरच्या नऊ महिन्यांमध्ये एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सध्या शिवसागर जलाशयात ७७. ३३ टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातील ३९.३२ टीएमसी पाणीवापर वीजनिर्मितीसाठी तर सांगलीकडील पाण्याची गरज भागविण्यासाठी २१ टीएमसी पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या की पाणीटंचाईची भीती आणि विजेच्या लोडशेडिंगचे भूत मानगुटीवर बसते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांच्या नजरा आपोपच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाकडे जातात. म्हणूनच कोयना धरणाची काय स्थिती आहे, हे वरचेवर जाणून घ्यावे लागते. कोयना धरण १०५. २५ टीएमसी पाणीक्षमता असणारे आहे. दिवसाला १९६० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पात आहेत. त्यासठी पोफळी येथे टप्पा क्रमांक १ आणि २ अलोरे व नवजा येथील चौथा टप्पामधून वीजनिर्मितीसाठी विद्युत जनित्रे पाण्यावर फिरविली जातात. दि. १ जून ते ३१ मे असे कोयना धरणातील पाण्याचे तांत्रिक नियोजन असते. त्यानुसार आजअखेर पोफळी १ व २ टप्पामधून ७५०. ४६ तसेच अलोरे येथून ३६५. १०, टप्पा क्र. ४ मधून ७०२. ९२ आण पायथा वीजगृहातून ५५. ८१ अशी एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती आजअखेर करण्यात आली आहे. त्यासाठी ३९. ३२ टीएमसी पाणीवापर झाला आहे. गतवर्षी याचदिवशी कोयना धरणात ५९.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या तो ७७.३३ टीएमसी इतका आहे. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सांगलीकडे पाणी सोडले जाते. तर अलोरे व पोफळी वीजगृहातील पाणी कोळकेवाडी धरणात साठवून चिपळूणकडे सोडले जाते. गतवर्षी कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठीचा पाणीवापर ८० टीएमसी पर्यंत गेल्यामुळे एप्रिल-मेमध्ये धरणात न भूतो न भविष्याती असा खडखडाट झाला होता. त्यामुळे यंदा तसे होणार नाही. याची दक्षता घेण्यात आल्याचे शिल्लक पाणीसाठा ७७. ३३ टीएमसी वरून लक्षात येते. पाण्याचा पूर्णक्षमतेने वापर ...मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचा काळ कोयना धरणासाठी काळ बनूनच येतो. कारण सांगलीकडे पाणी मागणी वाढते तर वीजनिर्मितीची तहान देखील अधिक तीव्र होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याचा वापर झपाट्याने होतो. येत्या १ जूनपर्यंत कोयना धरणातील पाण्याचा पुरेपूर वापर व्हावाच, अशी अपेक्षा असते. कारण त्यानंतर पावसाळा सुरू होतो. तेव्हा त्याअगोदर पूर्णक्षमतेने पाणीवापर झालाच पाहिजे.सध्या कोयना धरणातील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. सध्या असणारा ७७. ३३ टीएमसी पाणीसाठा हा आगामी काळासाठी करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेती सिंचनासाठी शाश्वत ठरणारा आहे.- व्ही. एस. तोंडले, शाखा अभियंता