शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

नऊ महिन्यांत सांगलीसाठी २१ टीएमसी पाणी

By admin | Updated: February 18, 2015 23:47 IST

कोयनेत समाधानकारक पाणीसाठा : १८७४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती; सध्या ८० टक्के पाणीसाठा शिल्लक

अरुण पवार - पाटण -जलविद्युत निर्मितीचा अखंड स्त्रोत असणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर एक जुलैपासून आजअखेरच्या नऊ महिन्यांमध्ये एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सध्या शिवसागर जलाशयात ७७. ३३ टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातील ३९.३२ टीएमसी पाणीवापर वीजनिर्मितीसाठी तर सांगलीकडील पाण्याची गरज भागविण्यासाठी २१ टीएमसी पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या की पाणीटंचाईची भीती आणि विजेच्या लोडशेडिंगचे भूत मानगुटीवर बसते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांच्या नजरा आपोपच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाकडे जातात. म्हणूनच कोयना धरणाची काय स्थिती आहे, हे वरचेवर जाणून घ्यावे लागते. कोयना धरण १०५. २५ टीएमसी पाणीक्षमता असणारे आहे. दिवसाला १९६० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पात आहेत. त्यासठी पोफळी येथे टप्पा क्रमांक १ आणि २ अलोरे व नवजा येथील चौथा टप्पामधून वीजनिर्मितीसाठी विद्युत जनित्रे पाण्यावर फिरविली जातात. दि. १ जून ते ३१ मे असे कोयना धरणातील पाण्याचे तांत्रिक नियोजन असते. त्यानुसार आजअखेर पोफळी १ व २ टप्पामधून ७५०. ४६ तसेच अलोरे येथून ३६५. १०, टप्पा क्र. ४ मधून ७०२. ९२ आण पायथा वीजगृहातून ५५. ८१ अशी एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती आजअखेर करण्यात आली आहे. त्यासाठी ३९. ३२ टीएमसी पाणीवापर झाला आहे. गतवर्षी याचदिवशी कोयना धरणात ५९.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या तो ७७.३३ टीएमसी इतका आहे. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सांगलीकडे पाणी सोडले जाते. तर अलोरे व पोफळी वीजगृहातील पाणी कोळकेवाडी धरणात साठवून चिपळूणकडे सोडले जाते. गतवर्षी कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठीचा पाणीवापर ८० टीएमसी पर्यंत गेल्यामुळे एप्रिल-मेमध्ये धरणात न भूतो न भविष्याती असा खडखडाट झाला होता. त्यामुळे यंदा तसे होणार नाही. याची दक्षता घेण्यात आल्याचे शिल्लक पाणीसाठा ७७. ३३ टीएमसी वरून लक्षात येते. पाण्याचा पूर्णक्षमतेने वापर ...मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचा काळ कोयना धरणासाठी काळ बनूनच येतो. कारण सांगलीकडे पाणी मागणी वाढते तर वीजनिर्मितीची तहान देखील अधिक तीव्र होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याचा वापर झपाट्याने होतो. येत्या १ जूनपर्यंत कोयना धरणातील पाण्याचा पुरेपूर वापर व्हावाच, अशी अपेक्षा असते. कारण त्यानंतर पावसाळा सुरू होतो. तेव्हा त्याअगोदर पूर्णक्षमतेने पाणीवापर झालाच पाहिजे.सध्या कोयना धरणातील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. सध्या असणारा ७७. ३३ टीएमसी पाणीसाठा हा आगामी काळासाठी करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेती सिंचनासाठी शाश्वत ठरणारा आहे.- व्ही. एस. तोंडले, शाखा अभियंता