शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

२०६ कूपनलिका गंजू लागल्या सातारा शहरातील चित्र : पाणी असूनही वापर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:20 IST

सातारा : टंचाई काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने शहर व परिसरात कूपनलिका बसविण्यात आल्या. या कूपनलिकांचा वापर आजही नागरिकांकडून केला जात

ठळक मुद्देपालिकेकडून उपाययोजनेची गरज

सचिन काकडे ।सातारा : टंचाई काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने शहर व परिसरात कूपनलिका बसविण्यात आल्या. या कूपनलिकांचा वापर आजही नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, पालिकेकडून नियमितपणे देखभाल व दुरुस्ती केली न गेल्याने पाणी असूनही काही कूपनलिका नावापुरत्या उरल्या आहेत. शहरात एकूण २०६ कूपनलिका असून, यापैकी अनेकांना गंज चढला आहे तर काही मोडकळीसही आल्या आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वात जुनी पाणीयोजना आहे. शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी पाहता भविष्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता यावी, यासाठी पालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कूपनलिका उभारण्यात आल्या. सध्या शहर व परिसरात एकूण २०६ कूपनलिका असून, यापैकी बहुतांश नादुरुस्त असून, काहींना गंजही चढला आहे.

काही कूपनलिकांचे पाणी पिण्यायोग्य असल्याने नागरिक याचा पिण्यासह दैनंदिन कामासाठी वापर करीत होते. घरगुती नळांना पाणी न आल्यास गृहिणींना कूपनलिकांचाच आधार मिळत आहे. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. कूपनलिकांना पाणी असूनही याचा वापर करता येत नाही. पालिकेकडून पाणी बचतीसाठी जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे कूपनलिकांची दुरवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कूपनलिकांची दुरुस्तीची मागणी आहे.दुरुस्तीचे १५ प्रस्ताव दाखलपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कूपनलिका दुरुस्तीचे आतापर्यंत पंधरा प्रस्ताव दाखल झाले आहेत. दुरुस्तीसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध होताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. 

पाणी नसलेले पंप बंदशहरातील कूपनलिका गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली आहे. ज्या कूपनलिकांचा पाणी आहे, अशाच कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. ज्या कूपनलिका गंजल्या आहेत व ज्यांना पाणीच नाही, अशा कूपनलिका बंद केल्या जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.