शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

मुंबईतून येणार २००५ गाड्या

By admin | Updated: September 11, 2015 23:45 IST

के. बी. देशमुख : खासगी आरक्षणात रत्नागिरी महाराष्ट्रात प्रथम

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचा ओघ लक्षात घेऊन एस. टी. महामंडळातर्फे मुंबईतून २००५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीसाठीही १५०० गाड्यांचे नियोजन असून, त्यापैकी ६०० गाड्यांचे आरक्षणही झाले असल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एस. टी. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.ते म्हणाले की, मुंबईहून १२ तारखेपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. १२ रोजी १९, दि. १३ रोजी ६९, दि. १४ रोजी ३०७, दि. १५ रोजी सर्वाधिक १३३२ आणि १६ रोजी २७८ गाड्या सुटणार आहेत. या गाड्यांना टोल असणार नाही. वडखळ नाका येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी १५ तारखेपर्यंत मुंबईहून येणाऱ्या गाड्या पुुणेमार्गे मुुंबईला जातील तर चिपळूणला आलेल्या गाड्या कात्रजमार्गे जातील. गेल्या सहा महिन्यात ४९७ चालकांची भरती करण्यात आल्याने आता चालकांची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले. गणेशोत्सव कालावधीत अपघात होऊ नये, यासाठी यावर्षी एस. टी. महामंडळाने वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. कशेडी घाट उतरल्यानंतर मुख्य चेकपोस्ट येथे चालक - वाहकांना ताजेतवाने होण्यासाठी अल्पोपहार देण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर (चिपळूण) आणि संगमेश्वर येथे दुरूस्ती पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वर ते खारेपाटण आणि संगमेश्वर ते कशेडी अशी दोन भरारी पथके २४ तास कार्यरत रहाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. कोकण रेल्वे प्रशासनाने यावर्षी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण आणि रत्नागिरी येथे सर्व स्थानिक आणि शहरी गाड्या व्हाया रेल्वेस्थानक करण्यात येणार आहेत. यावर्षीही ग्रुप बुकिंग सेवा देण्यात येणार असून, त्यातीलच ६ गाड्यांचे आरक्षण गुहागर तालुक्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत एस. टी. सेवेबाबत माहिती देण्यासाठी मुख्य स्थानकावर प्रवासी मित्रही नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच बसस्थानकांवर प्रवाशांच्या स्वागताचे बॅनरही लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एस. टी. ची माहितीपुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.खासगी आरक्षणात रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून, जिल्ह्यात ५३ खासगी आरक्षण सेवाकेंद्रे असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)परतीच्या ६०० गाड्यांचे आरक्षणवडखळ नाका येथील कोंडीवर उपाय.परतीच्या ६०० गाड्यांचे आरक्षण.गाड्यांना टोल नाही.चालकांची कमतरता नाही.दुरूस्ती पथक तैनात.कशेडी घाटात अल्पोपहाराची व्यवस्था.