शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मुंबईतून येणार २००५ गाड्या

By admin | Updated: September 11, 2015 23:45 IST

के. बी. देशमुख : खासगी आरक्षणात रत्नागिरी महाराष्ट्रात प्रथम

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचा ओघ लक्षात घेऊन एस. टी. महामंडळातर्फे मुंबईतून २००५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीसाठीही १५०० गाड्यांचे नियोजन असून, त्यापैकी ६०० गाड्यांचे आरक्षणही झाले असल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एस. टी. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.ते म्हणाले की, मुंबईहून १२ तारखेपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. १२ रोजी १९, दि. १३ रोजी ६९, दि. १४ रोजी ३०७, दि. १५ रोजी सर्वाधिक १३३२ आणि १६ रोजी २७८ गाड्या सुटणार आहेत. या गाड्यांना टोल असणार नाही. वडखळ नाका येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी १५ तारखेपर्यंत मुंबईहून येणाऱ्या गाड्या पुुणेमार्गे मुुंबईला जातील तर चिपळूणला आलेल्या गाड्या कात्रजमार्गे जातील. गेल्या सहा महिन्यात ४९७ चालकांची भरती करण्यात आल्याने आता चालकांची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले. गणेशोत्सव कालावधीत अपघात होऊ नये, यासाठी यावर्षी एस. टी. महामंडळाने वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. कशेडी घाट उतरल्यानंतर मुख्य चेकपोस्ट येथे चालक - वाहकांना ताजेतवाने होण्यासाठी अल्पोपहार देण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर (चिपळूण) आणि संगमेश्वर येथे दुरूस्ती पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वर ते खारेपाटण आणि संगमेश्वर ते कशेडी अशी दोन भरारी पथके २४ तास कार्यरत रहाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. कोकण रेल्वे प्रशासनाने यावर्षी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण आणि रत्नागिरी येथे सर्व स्थानिक आणि शहरी गाड्या व्हाया रेल्वेस्थानक करण्यात येणार आहेत. यावर्षीही ग्रुप बुकिंग सेवा देण्यात येणार असून, त्यातीलच ६ गाड्यांचे आरक्षण गुहागर तालुक्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत एस. टी. सेवेबाबत माहिती देण्यासाठी मुख्य स्थानकावर प्रवासी मित्रही नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच बसस्थानकांवर प्रवाशांच्या स्वागताचे बॅनरही लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एस. टी. ची माहितीपुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.खासगी आरक्षणात रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून, जिल्ह्यात ५३ खासगी आरक्षण सेवाकेंद्रे असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)परतीच्या ६०० गाड्यांचे आरक्षणवडखळ नाका येथील कोंडीवर उपाय.परतीच्या ६०० गाड्यांचे आरक्षण.गाड्यांना टोल नाही.चालकांची कमतरता नाही.दुरूस्ती पथक तैनात.कशेडी घाटात अल्पोपहाराची व्यवस्था.