शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मितीच्या सातार्‍यात २00 मेगावॅटचा तुटवडा

By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST

निर्मिती कमी अन् मागणी मोठी : उन्हाचा तडाखा कमी झाला तरच होणार भारनियमन कमी

 सातारा : ‘निर्मिती कमी अन् मागणी मोठी’ राहिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भारनियमन सुरू झाले आहे. त्याचा फटका वीजनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणार्‍या सातारा जिल्ह्याला बसू लागला आहे. महाराष्ट्र उजळून टाकणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असतानाच सातारकरांना मात्र गेले दोन दिवस २00 मेगावॅट विजेचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, सद्या सुरू असलेले भारनियमन हे तात्पुरते असल्याचा दावा ‘महावितरण’च्या सातारा कार्यालयाने केला आहे. उन्हाचा तडाखा कमी झाला तरच भारनियमन कमी होईल, असे चित्र सध्या तरी आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा बसू लागल्यामुळे साहजिकच वीजेची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे विद्युत वाहिन्यांवर त्याचा ताण येत असून कोणत्याही अनेक भागातील फ्युजा जळत आहेत. त्याचबरोबर अनेकदा डीपीसेंटरही नादुरुस्त होत आहे. सातारा शहरात गेल्या काही दिवसांत असे प्रकार अनेक घडले आहेत. महाराष्ट्रात भारनियमनाचे ‘ए ते जी’ असे सात ग्रुप असून ‘एफ ते सी’ या तीन टप्प्यांत भारनियमन नेहमीच होत असते. वेळेवर वसुली आणि बिल भरणा असल्यामुळे सातारा जिल्ह्यात मात्र, ‘एफ ते सी’ हे तीन ग्रुप नाहीत. परिणामी भारनियमनाचा प्रश्नच येत नव्हता. मात्र, वाढता उष्मा परिणमी विजेचा वाढलेला वापर यामुळे फक्त साताराच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा फटका बसू लागला आहे. सातार्‍यात आता ‘सी ते डी’ या दोन गटात भारनियमन करावे लागणार आहे. सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्यामुळे बहुतांशी धरणातून वीजनिर्मितीही होते. कोयना धरणातून दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होते. रात्रीच्यावेळी महाराष्ट्राचा अंधार दूर करण्यात कोयना धरणाने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यातच आहे. त्यातच सातारा जिल्ह्याची मागणी ७00 ते ७५0 मेगावॅट आहे. मात्र, आता प्रत्यक्षात सातारा जिल्ह्याला ५00 ते ५५0 मेगावॅट वीज मिळत आहे. सातारा जिल्ह्यात ‘ए ते डी’च्या १६८ वीजवाहिन्या आहेत. यापैकी ‘सी आणि डी’मध्ये कृषी पंप आहेत. कृषी पंपासाठी मात्र, ‘महावितरण’चे धोरण निश्चित असून त्याची कार्यवाही योग्य पध्दतीने सुरू आहे. येथे आठवड्यातील तीन दिवस रात्री दहा तास आणि दिवसा आठ तास अखंडित वीजपुरवठा केला जातो. मात्र, कृषी पंपानाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असून भारनियमनात वाढ होणार आहे. परिणामी याचा फटका कृषी क्षेत्राला बसणार असून उत्पादनात घटणार आहे. (प्रतिनिधी) नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग