शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

वीजनिर्मितीच्या सातार्‍यात २00 मेगावॅटचा तुटवडा

By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST

निर्मिती कमी अन् मागणी मोठी : उन्हाचा तडाखा कमी झाला तरच होणार भारनियमन कमी

 सातारा : ‘निर्मिती कमी अन् मागणी मोठी’ राहिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भारनियमन सुरू झाले आहे. त्याचा फटका वीजनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणार्‍या सातारा जिल्ह्याला बसू लागला आहे. महाराष्ट्र उजळून टाकणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असतानाच सातारकरांना मात्र गेले दोन दिवस २00 मेगावॅट विजेचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, सद्या सुरू असलेले भारनियमन हे तात्पुरते असल्याचा दावा ‘महावितरण’च्या सातारा कार्यालयाने केला आहे. उन्हाचा तडाखा कमी झाला तरच भारनियमन कमी होईल, असे चित्र सध्या तरी आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा बसू लागल्यामुळे साहजिकच वीजेची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे विद्युत वाहिन्यांवर त्याचा ताण येत असून कोणत्याही अनेक भागातील फ्युजा जळत आहेत. त्याचबरोबर अनेकदा डीपीसेंटरही नादुरुस्त होत आहे. सातारा शहरात गेल्या काही दिवसांत असे प्रकार अनेक घडले आहेत. महाराष्ट्रात भारनियमनाचे ‘ए ते जी’ असे सात ग्रुप असून ‘एफ ते सी’ या तीन टप्प्यांत भारनियमन नेहमीच होत असते. वेळेवर वसुली आणि बिल भरणा असल्यामुळे सातारा जिल्ह्यात मात्र, ‘एफ ते सी’ हे तीन ग्रुप नाहीत. परिणामी भारनियमनाचा प्रश्नच येत नव्हता. मात्र, वाढता उष्मा परिणमी विजेचा वाढलेला वापर यामुळे फक्त साताराच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा फटका बसू लागला आहे. सातार्‍यात आता ‘सी ते डी’ या दोन गटात भारनियमन करावे लागणार आहे. सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्यामुळे बहुतांशी धरणातून वीजनिर्मितीही होते. कोयना धरणातून दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होते. रात्रीच्यावेळी महाराष्ट्राचा अंधार दूर करण्यात कोयना धरणाने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यातच आहे. त्यातच सातारा जिल्ह्याची मागणी ७00 ते ७५0 मेगावॅट आहे. मात्र, आता प्रत्यक्षात सातारा जिल्ह्याला ५00 ते ५५0 मेगावॅट वीज मिळत आहे. सातारा जिल्ह्यात ‘ए ते डी’च्या १६८ वीजवाहिन्या आहेत. यापैकी ‘सी आणि डी’मध्ये कृषी पंप आहेत. कृषी पंपासाठी मात्र, ‘महावितरण’चे धोरण निश्चित असून त्याची कार्यवाही योग्य पध्दतीने सुरू आहे. येथे आठवड्यातील तीन दिवस रात्री दहा तास आणि दिवसा आठ तास अखंडित वीजपुरवठा केला जातो. मात्र, कृषी पंपानाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असून भारनियमनात वाढ होणार आहे. परिणामी याचा फटका कृषी क्षेत्राला बसणार असून उत्पादनात घटणार आहे. (प्रतिनिधी) नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग