शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीपूर्वीच ग्राहकाच्या हातात १९ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते ...

कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते बिल मुदतीत न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल असेही त्यात नमूद केले आहे. ही काही काल्पनिक कथा नाही तर आणे ( ता. कराड) येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. त्यामुळेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे .

आणे (ता. कराड) येथील आनंदराव तुकाराम देसाई यांनी गतवर्षी वांग नदीतून शेतीसाठी पाणी उचलण्यासाठी रीतसर परवाना घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी वीज कंपनीकडे जोडणीसाठी अर्ज केलेला आहे. जोडणी त्वरित मिळावी म्हणून आजवर अनेक हेलपाटेही त्यांनी कार्यालयात घातले आहेत; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पण तरीही त्यांच्या हातात वीज बिल मिळाल्याने त्याला धक्काच बसला आहे.

हे बिल हातात पडल्यावर संबंधित शेतकरी अचंबित झाला असून त्याने कोळेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कार्यालयात सदरचे बिल दाखवले.तेथील कर्मचाऱ्यांना हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी वीज बिल चुकले आहे. ते बदलून दुरुस्त करून आणा. अशी जुजबी उत्तरे दिली आहेत.पण चूक का व कशामुळे झाली याबाबत शब्द काढलेला नाही. परिणामी वयोवृद्ध असणाऱ्या देसाई यांची चूक नसताना हाल सुरू आहेत.

वास्तविक वीज जोडणी केल्यानंतर मोटार बसवल्यानंतर त्याचा टेस्टिंग रिपोर्ट सादर केला जातो. त्यानंतर वापर सुरू झाल्यावर त्याचे रीडिंग तपासले जाते. त्यानंतर वीज बिल ग्राहकाला दिले जाते. मग आणे येथील संबंधित शेतकऱ्याला वीज जोडणी न देताच त्याचा टेस्टिंग रिपोर्ट कसा केला गेला? वीज वापरच नसताना त्याचे रीडिंग कोणी व कसे घेतले? हा सारा संशोधनाचा भाग आहे.

चौकट

ग्राहकांच्या मनात शंका

वीज कनेक्शन न जोडता वापराचे रीडिंग न घेताच जर वीज वितरण कंपनी ग्राहकाला वीज बिल देत असेल तर ही बाब मोठी गंभीर आहे. शिवाय आपल्या वापरातील वीज मीटरमधील रीडिंग तरी व्यवस्थित घेतली जातात का?त्यात काही झोल आहे का? अशा प्रकारच्या शंका आता ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.

(कोट)

मुळातच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांचे पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई मिळेल का? याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने अशाप्रकारे अनागोंदी कारभार करून वीजजोडणी न करता आज जर वीज बिले द्यायला सुरुवात केली. तर ही बाब गंभीर आहे. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचा समाचार घेऊ.

-सचिन नलावडे

रयत क्रांती शेतकरी संघटना