शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वीज जोडणीपूर्वीच ग्राहकाच्या हातात १९ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते ...

कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते बिल मुदतीत न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल असेही त्यात नमूद केले आहे. ही काही काल्पनिक कथा नाही तर आणे ( ता. कराड) येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. त्यामुळेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे .

आणे (ता. कराड) येथील आनंदराव तुकाराम देसाई यांनी गतवर्षी वांग नदीतून शेतीसाठी पाणी उचलण्यासाठी रीतसर परवाना घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी वीज कंपनीकडे जोडणीसाठी अर्ज केलेला आहे. जोडणी त्वरित मिळावी म्हणून आजवर अनेक हेलपाटेही त्यांनी कार्यालयात घातले आहेत; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पण तरीही त्यांच्या हातात वीज बिल मिळाल्याने त्याला धक्काच बसला आहे.

हे बिल हातात पडल्यावर संबंधित शेतकरी अचंबित झाला असून त्याने कोळेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कार्यालयात सदरचे बिल दाखवले.तेथील कर्मचाऱ्यांना हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी वीज बिल चुकले आहे. ते बदलून दुरुस्त करून आणा. अशी जुजबी उत्तरे दिली आहेत.पण चूक का व कशामुळे झाली याबाबत शब्द काढलेला नाही. परिणामी वयोवृद्ध असणाऱ्या देसाई यांची चूक नसताना हाल सुरू आहेत.

वास्तविक वीज जोडणी केल्यानंतर मोटार बसवल्यानंतर त्याचा टेस्टिंग रिपोर्ट सादर केला जातो. त्यानंतर वापर सुरू झाल्यावर त्याचे रीडिंग तपासले जाते. त्यानंतर वीज बिल ग्राहकाला दिले जाते. मग आणे येथील संबंधित शेतकऱ्याला वीज जोडणी न देताच त्याचा टेस्टिंग रिपोर्ट कसा केला गेला? वीज वापरच नसताना त्याचे रीडिंग कोणी व कसे घेतले? हा सारा संशोधनाचा भाग आहे.

चौकट

ग्राहकांच्या मनात शंका

वीज कनेक्शन न जोडता वापराचे रीडिंग न घेताच जर वीज वितरण कंपनी ग्राहकाला वीज बिल देत असेल तर ही बाब मोठी गंभीर आहे. शिवाय आपल्या वापरातील वीज मीटरमधील रीडिंग तरी व्यवस्थित घेतली जातात का?त्यात काही झोल आहे का? अशा प्रकारच्या शंका आता ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.

(कोट)

मुळातच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांचे पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई मिळेल का? याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने अशाप्रकारे अनागोंदी कारभार करून वीजजोडणी न करता आज जर वीज बिले द्यायला सुरुवात केली. तर ही बाब गंभीर आहे. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचा समाचार घेऊ.

-सचिन नलावडे

रयत क्रांती शेतकरी संघटना