शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१८९ किलोमीटरचा परिसर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:13 IST

सातारा : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वेळे, ता. वाई ते पाचवड नाका (कºहाड) हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस ...

सातारा : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वेळे, ता. वाई ते पाचवड नाका (कºहाड) हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस रोडवर एकूण १८९ किलोमीटरच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. तसेच दोन टोलनाके व ४४ उड्डाणपुलांची देखील स्वच्छता करण्यात आली.रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने राज्यपाल नियुक्त स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पुण्याहून-कोल्हापूरकडे जाणाऱ्या आशियाई महामार्गावर स्वच्छता करण्यात आली.स्वच्छता अभियानांतर्गत तब्बल ३ हजार ६१२ सदस्यांनी कचरा गोळा करून त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी कºहाड नगरपरिषदेच्या सुका कचरा संस्करण केंद्र्रास पाठविण्यात आला.दरम्यान, या महामार्गाावरून वाहतूक करणाºया सरासरी सात ते आठ हजार गाड्यांतील साधारण लाखो प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यास प्रतिष्ठानचे कार्य यशस्वी झाले आहे. यावेळी कित्येक वाहनचालकांनी चालू गाडीतून कचरा अथवा प्लास्टिक बाहेर न टाकण्याचा मानस व्यक्त केला. ही प्रतिष्ठानच्या कार्यास मिळालेली पोचपावतीच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.गाव, वाड्या, वस्त्या, सरकारी, निमसरकारी कार्यालये, शहरातील मुख्य रस्ते व उपरस्ते, न्यायालय, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, तलाव नदीकाठचा परिसर, स्मशानभूमी, दफनभूमी आदी ठिकाणी प्रतिष्ठानमार्फत आत्तापर्यंत स्वच्छता अभियाने यशस्वीरीत्या झाली आहेत. मात्र १८९ किलोमीटर आशियाई महामार्गाची दुतर्फा सेवारस्ता स्वच्छता करण्याचा संकल्प जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. यामुळे सर्व स्तरातून प्रतिष्ठानचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.दरम्यान, या स्वच्छता अभियानात जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह पलंगे, खेड सरपंच इंदिरा बोराटे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, बासुतली खान, सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग कºहाड अस्मिता पाटील, उंब्रजचे उपसरपंच अजित जाधव, उत्तम कांबळे नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. तसेच मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दाताळे, घमेली, खोरे, झाडू, पंजे आदी साहित्य स्वत: आणून स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडले.