शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

१७६ शाळा शंभर टक्के

By admin | Updated: June 13, 2017 23:35 IST

१७६ शाळा शंभर टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. वर्षीप्रमाणेच कोकण विभागानं अव्वल कामगिरी केली असून कोकण विभागाचा ९६.१८ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९४.९१ टक्के मिळवले. जिल्ह्याचा ९३ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागात जिल्हानिहाय निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ९४.९१ टक्के, सातारा जिल्ह्याने ९३ टक्के व सांगली जिल्ह्याने ९२.४१ टक्के मिळवले. सातारा जिल्ह्यातील ६९९ शाळांमधून ४४ हजार ४६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एकूण ९३ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातही मुलींच बाजी मारली असून ९५.२६ मुली उत्तीर्ण झाल्ंया असून ९१.२० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ जूनला गुणपत्रिका मिळणार असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १७६ शाळांचा शंभर टक्के निकालकोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्यातून ६९८ शाळांमधून ४४ हजार ४६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी १७६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तालुका निहाय टक्केवारीमध्ये डोंगराळ व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याचा सर्वाधिक ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर वाई तालुक्याचा ९४.७८ टक्के व तृतीय क्रमांक दुष्काळी माण तालुक्याचा ९४.५४ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक कमी फलटण तालुक्याचा ९०.०९ टक्के निकाल जाहीर झाला आहे.