शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

By admin | Updated: September 16, 2016 23:43 IST

अवजड वाहतूक बंद : सातारा - लोणंद, फलटण, बारामतीची वाहने कोरेगावमार्गे वळविली

सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील १७१ वर्षे जुन्या पेशवेकालीन पुलावरील रस्ता तसेच पायाजवळ शुक्रवारी दुपारी भगदाड पडले. संभाव्य धोका ओळखून हा पूल शुक्रवारपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सातारा-लोणंद, फलटण, बारामतीची सर्व वाहने कोरेगाव मार्गे वळविली आहेत.सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम पेशवेकालीन आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटिश सरकारने पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपले असल्याचे सूचित केले आहे. महाड दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व पेशवेकालीन पुलांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यावेळी वडूथ-आरळे येथील पुलावर एक-दोन ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, काटेरी झुडपे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘हा पूल वाहतुकीसाठी चांगला आहे,’ असे सांगितले होते. साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारी सर्व वाहतूक वडूथ-आरळे येथील या पुलावरून केली जाते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. आरळे बाजूने महिन्यापूर्वी दोन फुटांचा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामध्ये चार डंपर मुरूम टाकून तो मुजविला होता. त्यावेळीच ग्रामस्थ पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पुलाला सुरुवात होते तेथे व पायाजवळ मोठे भगदाड पडल्याचे शुक्रवारी दुपारी निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. त्यानुसार ही वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-------------------उदयनराजेंकडून अधिकाऱ्यांना सूचनाआरळे पुलाला भगदाड पडल्याचे समजल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या पुलाची तत्काळ पाहणी करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी सहकार्यांसमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा गीतांजली कदम, प्रताप शिंदे उपस्थित होते.\‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे व झुडपे वाढली आहेत. तसेच पुलावरील ड्रेनेज पाईप बुजले असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी साठत असते. प्रत्येक वेळी पुलावर होणाऱ्या डांबरीकरणामुळे पुलाचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत पुलावरून अवजड वाहने वाढली असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता ‘लोकमत’ने यापूर्वीच व्यक्त केली होती.अठरा किलोमीटरचे अंतर वाढले...वडूथ-आरळे पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारे ट्रक, टेम्पो, एसटी बसेस कोरेगाव मार्गे वळविल्या आहेत. त्यामुळे साधारणत: अठरा कि.मी.चे अंतर वाढले आहे.