शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

By admin | Updated: September 16, 2016 23:43 IST

अवजड वाहतूक बंद : सातारा - लोणंद, फलटण, बारामतीची वाहने कोरेगावमार्गे वळविली

सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील १७१ वर्षे जुन्या पेशवेकालीन पुलावरील रस्ता तसेच पायाजवळ शुक्रवारी दुपारी भगदाड पडले. संभाव्य धोका ओळखून हा पूल शुक्रवारपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सातारा-लोणंद, फलटण, बारामतीची सर्व वाहने कोरेगाव मार्गे वळविली आहेत.सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम पेशवेकालीन आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटिश सरकारने पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपले असल्याचे सूचित केले आहे. महाड दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व पेशवेकालीन पुलांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यावेळी वडूथ-आरळे येथील पुलावर एक-दोन ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, काटेरी झुडपे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘हा पूल वाहतुकीसाठी चांगला आहे,’ असे सांगितले होते. साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारी सर्व वाहतूक वडूथ-आरळे येथील या पुलावरून केली जाते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. आरळे बाजूने महिन्यापूर्वी दोन फुटांचा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामध्ये चार डंपर मुरूम टाकून तो मुजविला होता. त्यावेळीच ग्रामस्थ पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पुलाला सुरुवात होते तेथे व पायाजवळ मोठे भगदाड पडल्याचे शुक्रवारी दुपारी निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. त्यानुसार ही वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-------------------उदयनराजेंकडून अधिकाऱ्यांना सूचनाआरळे पुलाला भगदाड पडल्याचे समजल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या पुलाची तत्काळ पाहणी करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी सहकार्यांसमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा गीतांजली कदम, प्रताप शिंदे उपस्थित होते.\‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे व झुडपे वाढली आहेत. तसेच पुलावरील ड्रेनेज पाईप बुजले असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी साठत असते. प्रत्येक वेळी पुलावर होणाऱ्या डांबरीकरणामुळे पुलाचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत पुलावरून अवजड वाहने वाढली असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता ‘लोकमत’ने यापूर्वीच व्यक्त केली होती.अठरा किलोमीटरचे अंतर वाढले...वडूथ-आरळे पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारे ट्रक, टेम्पो, एसटी बसेस कोरेगाव मार्गे वळविल्या आहेत. त्यामुळे साधारणत: अठरा कि.मी.चे अंतर वाढले आहे.