शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

१७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

By admin | Updated: September 16, 2016 23:43 IST

अवजड वाहतूक बंद : सातारा - लोणंद, फलटण, बारामतीची वाहने कोरेगावमार्गे वळविली

सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील १७१ वर्षे जुन्या पेशवेकालीन पुलावरील रस्ता तसेच पायाजवळ शुक्रवारी दुपारी भगदाड पडले. संभाव्य धोका ओळखून हा पूल शुक्रवारपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सातारा-लोणंद, फलटण, बारामतीची सर्व वाहने कोरेगाव मार्गे वळविली आहेत.सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम पेशवेकालीन आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटिश सरकारने पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपले असल्याचे सूचित केले आहे. महाड दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व पेशवेकालीन पुलांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यावेळी वडूथ-आरळे येथील पुलावर एक-दोन ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, काटेरी झुडपे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘हा पूल वाहतुकीसाठी चांगला आहे,’ असे सांगितले होते. साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारी सर्व वाहतूक वडूथ-आरळे येथील या पुलावरून केली जाते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. आरळे बाजूने महिन्यापूर्वी दोन फुटांचा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामध्ये चार डंपर मुरूम टाकून तो मुजविला होता. त्यावेळीच ग्रामस्थ पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पुलाला सुरुवात होते तेथे व पायाजवळ मोठे भगदाड पडल्याचे शुक्रवारी दुपारी निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. त्यानुसार ही वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-------------------उदयनराजेंकडून अधिकाऱ्यांना सूचनाआरळे पुलाला भगदाड पडल्याचे समजल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या पुलाची तत्काळ पाहणी करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी सहकार्यांसमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा गीतांजली कदम, प्रताप शिंदे उपस्थित होते.\‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे व झुडपे वाढली आहेत. तसेच पुलावरील ड्रेनेज पाईप बुजले असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी साठत असते. प्रत्येक वेळी पुलावर होणाऱ्या डांबरीकरणामुळे पुलाचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत पुलावरून अवजड वाहने वाढली असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता ‘लोकमत’ने यापूर्वीच व्यक्त केली होती.अठरा किलोमीटरचे अंतर वाढले...वडूथ-आरळे पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारे ट्रक, टेम्पो, एसटी बसेस कोरेगाव मार्गे वळविल्या आहेत. त्यामुळे साधारणत: अठरा कि.मी.चे अंतर वाढले आहे.