शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कऱ्हाड तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. छाननीत त्यापैकी ३००९ अर्ज ...

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. छाननीत त्यापैकी ३००९ अर्ज वैध ठरले असून, सोमवारी दुपारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. त्यासाठी येथील प्रशासनकीय कार्यालयात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. अखेर मुदतीत एकूण १ हजार ८३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीचे एकूण चित्र दुपारी स्पष्ट झाले. तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, महारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, चिखली, पाचुंद, गोटे, वसंतगड, उंडाळे, हरबरवाडी व विरवडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर २४६ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये हजारमाची ५, कामथी ७, किरपे ७, येणके ९, ओंड २, खुबी २, संजयनगर ९, शहापूर ८, वाघेश्वर ६, म्हासोली ७, लटकेवाडी ५, गमेवाडी ३, साकुर्डी १, भोळेवाडी ५, साळशिरंबे १, महारुगडेवाडी ७, शेवाळवाडी ४, शेळकेवाडी १, सवादे ६, शेवाळवाडी-उंडाळे २, पाडळी १, घोगाव ४, टाळगाव ९, गोटेवाडी १, भुरभुशी ७, शिवडे ५, भवानवाडी ४, अंबवडे ५, खालकरवाडी २, हरपळवाडी ३, वराडे १, आबईचीवाडी ६, खराडे २, नवीन कवठे १, गोळेश्वर २, खोडजाईवाडी ५, वाठार २, कोळे १, बामणवाडी २, पाचुंद ५, गोटे ११, वसंतगड ९, नांदलापूर १, भरेवाडी ३, काले ४, चौगुलेमळा ५, उंडाळे ९, अक्काईचीवाडी ३, हणबरवाडी ९, भुयाचीवाडी ३, विरवडे ११, वाघेरी १, कोडोली ६, गोवारे येथील १ अशा २४६ उमेदवरांचा समावेश आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थानिक आघाड्यांत दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. तर काही गावांमध्ये तिहेरी निवडणूक होत आहे. त्यामुळे गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारपासून निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

- चौकट

चिन्ह वाटपात कही खुशी, कही गम

उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप करण्यात आले. अपेक्षित चिन्ह मिळण्यासाठी अनेकांनी देवाला साकडे घातले होते. मात्र, चिन्ह वाटपात कही खुशी, कही गम असे वातावरण दिसले. अनेकांना अपेक्षित चिन्ह न मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा होती. तर काहींच्या अपेक्षित चिन्ह मिळाल्याचा आनंद होता.