शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी १६ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले ...

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी १६ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या प्रश्नाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी पत्र तयार केले असून, लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

सांगली जिल्ह्यातून टेंभू उपसा योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्याला जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कलेढोण गावापासून या योजनेचे पाणी जात असूनही, या भागाला आजपर्यंत या पाण्याचा लाभ कधी मिळाला नाही. याठिकाणी हजारो एकर कोरडवाहू शेती आहे. येथील शेतकरी कमी पाण्यावर येणारी व नगदी पीके घेतात. मात्र सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हातातोंडाला आलेले पीकही अनेकदा वाया जाते.

कमी पाण्यावर व माळरानावर येणारे पीक म्हणून प्रारंभी या भागातील शेतकरी द्राक्ष बागांकडे वळाले. आयुष्यभर कमावलेला पैसा बागेसाठी खर्च केला. त्यातून उदरनिर्वाह व परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रसंगी विकत पाणी घेऊन येथील शेतकरी द्राक्ष बागा जगवत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष या भागातून निर्यात होत आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागातील शेतकरी, ग्रामस्थ टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

या परिसरात पाण्यासाठी अनेक लहान मोठी आंदोलने झाली ; परंतु शासन दरबारी म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या भागातील कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, अनफळे पडळ, औतरवाडी, कठरेवाडी या ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी लेखी पत्र तयार केले असून लवकरच ही पत्रे घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अजित पवार भेट घेणार आहे.

(चौकट)

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी या भागातील ग्रामस्थांनी राजकारण विरहीत लढा उभारला आहे. त्यामुळे या लढ्याचे सर्वसामान्य ग्रामस्थही नेतृत्व करत आहे. शासनाने याबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे तरच या भागाचा विकास होईल.