शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

साताऱ्यात सैनिकांसाठी १५ लाखांची तरतूद!

By admin | Updated: February 26, 2016 00:47 IST

पालिका अर्थसंकल्प : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळाला दिलासा

सातारा : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सातारा नगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पात तब्बल १५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही तिप्पट वाढ करून तरतूद केल्याने सैनिक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी स्वनिधी खर्च करणारी महाराष्ट्रातील सातारा ही एकमेव पालिका ठरली आहे. राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त माजी सैनिक व माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्या प्रयत्नामुळे पालिकेला आपल्या अर्थसंकल्पात सैनिक कल्याणासाठी निधीची तरतूद करावी लागली. २०१२-१३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील यांनी सातारा पालिकेने बजेटमध्ये सैनिक कल्याणासाठी निधीची तरतूद करण्याचा आदेश दिला होता. माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी खर्च करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या; पण पालिकेने एका रुपयाचीही तरतूद केली नव्हती. शंकर माळवदे यांनी कडू-पाटील यांच्यानंतर आलेले जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांना लेखी पत्र देण्यात आले. पालिकेचे २०१३-१४ चे आर्थिक अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे गेले असताना त्यांनी ते रोखले. माजी सैनिकांसाठी आर्थिक तरतूद करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्यानंतर ही तरतूद खास बाब म्हणून करण्यात आली. त्यानंतर अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. या निधीच्या माध्यमातून सैनिकांचे हॉस्पिटल, मिलिट्री कॅन्टीन, मुला-मुलींचे वसतिगृह येथे सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दरम्यान, ही तरदूही कमी पडत असल्याने माळवदे यांनी पालिकेकडे १५ लाखांची तरतूद करण्याची विनंती केली होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेला या निधीची तरतूद करण्याची सूचना केली. त्यानुसार २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, माजी सैनिक रुग्णालयाचे कर्नल एम. एम. चव्हाण व मिलिटरी कॅन्टीनचे इन्चार्ज कर्नल शरद केंजळे यांनी पालिकेने केलेल्या तरतुदीबाबत समाधान व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी पालिकेच्या निधीच्या माध्यमातून सैनिक कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)