शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जिल्ह्यात ६७ टँकरने पाणीपुरवठा : ३५४ गावांत भीषण परिस्थितीे

सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार सरी कोसळत असताना दुष्काळी भागात मात्र टँकर फेऱ्या सुरुच आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजमितीस ६७ टँकरने ३५४ गावे आणि वाडीवस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८७ गावे आणि २६७ वाड्यांचा समावेश असून तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ४९ हजार ७५ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत जोरदार सरी कोसळल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र होते. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यातच काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे अनेक ठिकाणची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली होती. जिल्ह्यात गतवर्षी भयावह दुष्काळ होता, मात्र पाणलोट तसेच सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाल्यामुळे खास करून दुष्काळी भागात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत होती. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. काही ठिकाणी मात्र भयावह परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७0 वाड्यातील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावातील ४६ हजार २६७ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १७ गावातील ३१ हजार ३७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यात १४ टँकरने १५ गावे व ९७ वाड्यातील २६ हजार ९१0 लोकांना तर वाई तालुक्यात १ टँकरने १ गावातील २ हजार ९४९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू नये म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ६१ विहीरीचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील २४, खटाव २६, कोरेगाव २, खंडाळा ४, फलटण ३, वाई १ आणि कऱ्हाड तालुक्यातील १ विहीरीचा समावेश आहे.