शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जिल्ह्यात ६७ टँकरने पाणीपुरवठा : ३५४ गावांत भीषण परिस्थितीे

सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार सरी कोसळत असताना दुष्काळी भागात मात्र टँकर फेऱ्या सुरुच आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजमितीस ६७ टँकरने ३५४ गावे आणि वाडीवस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८७ गावे आणि २६७ वाड्यांचा समावेश असून तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ४९ हजार ७५ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत जोरदार सरी कोसळल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र होते. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यातच काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे अनेक ठिकाणची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली होती. जिल्ह्यात गतवर्षी भयावह दुष्काळ होता, मात्र पाणलोट तसेच सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाल्यामुळे खास करून दुष्काळी भागात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत होती. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. काही ठिकाणी मात्र भयावह परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७0 वाड्यातील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावातील ४६ हजार २६७ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १७ गावातील ३१ हजार ३७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यात १४ टँकरने १५ गावे व ९७ वाड्यातील २६ हजार ९१0 लोकांना तर वाई तालुक्यात १ टँकरने १ गावातील २ हजार ९४९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू नये म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ६१ विहीरीचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील २४, खटाव २६, कोरेगाव २, खंडाळा ४, फलटण ३, वाई १ आणि कऱ्हाड तालुक्यातील १ विहीरीचा समावेश आहे.