शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जिल्ह्यात ६७ टँकरने पाणीपुरवठा : ३५४ गावांत भीषण परिस्थितीे

सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार सरी कोसळत असताना दुष्काळी भागात मात्र टँकर फेऱ्या सुरुच आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजमितीस ६७ टँकरने ३५४ गावे आणि वाडीवस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८७ गावे आणि २६७ वाड्यांचा समावेश असून तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ४९ हजार ७५ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत जोरदार सरी कोसळल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र होते. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यातच काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे अनेक ठिकाणची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली होती. जिल्ह्यात गतवर्षी भयावह दुष्काळ होता, मात्र पाणलोट तसेच सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाल्यामुळे खास करून दुष्काळी भागात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत होती. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. काही ठिकाणी मात्र भयावह परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७0 वाड्यातील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावातील ४६ हजार २६७ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १७ गावातील ३१ हजार ३७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यात १४ टँकरने १५ गावे व ९७ वाड्यातील २६ हजार ९१0 लोकांना तर वाई तालुक्यात १ टँकरने १ गावातील २ हजार ९४९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू नये म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ६१ विहीरीचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील २४, खटाव २६, कोरेगाव २, खंडाळा ४, फलटण ३, वाई १ आणि कऱ्हाड तालुक्यातील १ विहीरीचा समावेश आहे.