शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

हक्काच्या पाण्यासाठी १४० गावचे शेतकरी आक्रमक

By admin | Updated: April 19, 2017 14:59 IST

रास्ता रोकोचा इशारा : जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यातील शेतीलाच सोडण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतमसूर(जि. सातारा) , दि. १९ : सातारा, कोरेगाव व कऱ्हाड तालुक्याचे हक्काचे आरफळचे पाणी सांगलीला पळवले जात आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील पिके वाळू लागलेली आहेत. आरफळ कॅनॉलमधील कन्हेर धरणातील हक्काचे रोटेशनचे पाणी तातडीने सातारा जिल्ह्यातील पिकांना सोडावे, अन्यथा सातारा येथील मुख्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा सातारा, कऱ्हाड, कोरेगांव तालुक्यातील १४० गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्यावतीने प्रशासनास देण्यात आला आहे.याबाबतची निवेदने संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्यावतीने पाठविण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटबंधारे विभाग आरफळ डावा कालवा हा कण्हेर धरणापासून करवडीपर्यंत, सातारा व कऱ्हाड तालुक्यातील सुमारे १४० गावापर्यंत जातो. या कालव्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ ते ३० हजार क्षेत्र प्रवाही सिंचनाने भिजत आहे. उन्हाळयाच्या दिवसात दर पंधरा दिवसाने पाण्याचे अवर्तन कालव्यामधून सोडण्याकरीता उन्हाळी हंगामाचे जाहीर प्रकटन धोम पाटबंधारे सातारा विभाग यांनी काढलेले आहे. त्यात २५ मार्च २०१७ रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे असताना ४ फेब्रुवारी २०१७ पासून अखंडपणे केवळ सांगलीकरीता व उरमोडी करीता पाणी सुरू असल्याने सुमारे ४० दिवस उलटून सुद्धा आजअखेर सातारा, कोरेगांव व कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही. सदर सातारचे पाणी सांगलीला जाण्याचेच फक्त पहावे लागत असल्याची दुदैर्वी वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे.अधिकाऱ्यांनी आरफळ कॅनॉलमधील कण्हेर धरणातील पाणी रोटेशन नुसार सोडण्यास टाळाटाळ केल्यास तसेच उन्हाळी हंगामाचे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे व २५ मे ते ३१ मे पर्यंतचे रितसर अवर्तने जाहीर केल्याप्रमाणे जाहीर प्रकटनानुसार पाणी न सोडल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. आंदोलनाबाबतची निवेदने उपकार्यकारी अभियंता लवटे, सहाय्यक अभियंता नांगरे व धोमपाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)बागायती पिकांची नुकसानपाण्याअभावी आरफळ कॅनॉल अंतर्गत असणारी क्षेत्रे माळरानातील व बागायती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हक्काचे अवर्तन असूनही स्वत:ची पिके वाळत चालली असल्याचे विदारक चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. अशी वस्तूस्थिती असतानाही पाणी नियोजन करणाऱ्या बेफिकीर संबंधीत अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सांगली जिल्हा अशाच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील पाणी पळवत असून आपल्या हक्काचे पाणी आपल्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही