शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

हक्काच्या पाण्यासाठी १४० गावचे शेतकरी आक्रमक

By admin | Updated: April 19, 2017 14:59 IST

रास्ता रोकोचा इशारा : जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यातील शेतीलाच सोडण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतमसूर(जि. सातारा) , दि. १९ : सातारा, कोरेगाव व कऱ्हाड तालुक्याचे हक्काचे आरफळचे पाणी सांगलीला पळवले जात आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील पिके वाळू लागलेली आहेत. आरफळ कॅनॉलमधील कन्हेर धरणातील हक्काचे रोटेशनचे पाणी तातडीने सातारा जिल्ह्यातील पिकांना सोडावे, अन्यथा सातारा येथील मुख्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा सातारा, कऱ्हाड, कोरेगांव तालुक्यातील १४० गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्यावतीने प्रशासनास देण्यात आला आहे.याबाबतची निवेदने संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्यावतीने पाठविण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटबंधारे विभाग आरफळ डावा कालवा हा कण्हेर धरणापासून करवडीपर्यंत, सातारा व कऱ्हाड तालुक्यातील सुमारे १४० गावापर्यंत जातो. या कालव्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ ते ३० हजार क्षेत्र प्रवाही सिंचनाने भिजत आहे. उन्हाळयाच्या दिवसात दर पंधरा दिवसाने पाण्याचे अवर्तन कालव्यामधून सोडण्याकरीता उन्हाळी हंगामाचे जाहीर प्रकटन धोम पाटबंधारे सातारा विभाग यांनी काढलेले आहे. त्यात २५ मार्च २०१७ रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे असताना ४ फेब्रुवारी २०१७ पासून अखंडपणे केवळ सांगलीकरीता व उरमोडी करीता पाणी सुरू असल्याने सुमारे ४० दिवस उलटून सुद्धा आजअखेर सातारा, कोरेगांव व कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही. सदर सातारचे पाणी सांगलीला जाण्याचेच फक्त पहावे लागत असल्याची दुदैर्वी वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे.अधिकाऱ्यांनी आरफळ कॅनॉलमधील कण्हेर धरणातील पाणी रोटेशन नुसार सोडण्यास टाळाटाळ केल्यास तसेच उन्हाळी हंगामाचे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे व २५ मे ते ३१ मे पर्यंतचे रितसर अवर्तने जाहीर केल्याप्रमाणे जाहीर प्रकटनानुसार पाणी न सोडल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. आंदोलनाबाबतची निवेदने उपकार्यकारी अभियंता लवटे, सहाय्यक अभियंता नांगरे व धोमपाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)बागायती पिकांची नुकसानपाण्याअभावी आरफळ कॅनॉल अंतर्गत असणारी क्षेत्रे माळरानातील व बागायती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हक्काचे अवर्तन असूनही स्वत:ची पिके वाळत चालली असल्याचे विदारक चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. अशी वस्तूस्थिती असतानाही पाणी नियोजन करणाऱ्या बेफिकीर संबंधीत अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सांगली जिल्हा अशाच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील पाणी पळवत असून आपल्या हक्काचे पाणी आपल्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही