शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

‘काळ्या आई’साठी लाथाडले १३ लाख!

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

शेतकऱ्यांचा स्वाभिमान : रस्त्यात जाणारी ऐतिहासिक विहीर वाचविण्यासाठी वनवासवाडीच्या लोखंडे कुटुंबीयांची धडपड

सागर गुजर, सातारा : शेतात घाम न गाळता १३ लाखांचा चेक हातात पडत असताना काळ्या आईच्या सेवेसाठी आणि पूर्वजांची ऐतिहासिक विहीर वाचविण्यासाठी वनवासवाडीच्या कुटुंबाने तो नाकारला. चित्रपटाला शोभेल असे हे कथानक साताऱ्यात वास्तवात घडले. रोज हजारो लोकांची तहान भागविणारी महामार्गालगतची विहीर वाचावी, प्रशासनाने पैसे न देता, तिला कठडा बांधावा, अशी या शेतकरी कुटुंबाची मागणी आहे. जलयुक्त शिवार योजना राबवून हिरवाई फुलविण्याचे प्रयत्न शासन एका बाजूला करत असताना उपलब्ध पाण्याचे स्रोत मुजविण्याचा सपाटा सहापदरीकरणाच्या कामात सुरू आहे. जमीन संपादनाची नोटीस नाही....पैसे नाहीत अन् शेतावर बुलडोझर फिरविण्याचे काम सातारा शहरालगत सुरू असल्याने महामार्गालगतचे शेतकरी व्यथित आहेत. पणजोबांच्या काळातली पाण्याने तुडुंब भरलेली विहीर वाचावी, यासाठी वनवासवाडीच्या लोखंडे कुटुंबीयांनी मात्र प्रयत्नांची शिकस्त सुरू केलीय. सुनील लोखंडे, पांडुरंग लोखंडे, गणेश लोखंडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची बॉम्बे रेस्टॉरंटपासून हाकेच्या अंतरावर दहा एकर एकतळी शेती आहे. पाण्यासाठी महामार्गालगत दगडी बांधकाम असलेली फार पूर्वीची विहीर आहे. गेल्या पावसाळ््यात वरुणराजा रुसला तरीही या विहिरीत तुडुंब पाणीसाठा आहे. शेतात सध्या ऊस, भात पिके आहेत. पाटानं खळाळतं पाणी, गोठ्यात धष्टपुष्ट म्हशी, तसेच दोन बैल, मळणी मशीन यापेक्षा शेतकऱ्याकडं या विहिरीचं मोठं वैभव आहे. सहापदरीकरणाचे काम सुरू झाले अन् या वैभवाला नजर लागली. पांडुरंग लोखंडे आणि त्यांचे कुटुंबीय सांगत होते, ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन संपादनाची नोटीस दिली नाही की, या जमिनीचे पैसेही दिले नाहीत. जेसीबी आला अन् जमिनीत घुसला. काम थांबवायला गेलो तर आमच्यावरच आरेरावी सुरू झाली. शासकीय कामात अडथळा आणला, म्हणून पोलीस केस करू, असं धमकावलं जातंय! आमचा विकासाला विरोध नाही; पण रीतसर गोष्टी व्हायला हव्या होत्या. पूर्वजांनी बांधलेली विहीर वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.’ ही काळी आई...धन-धान्य देई! जोडते मनाची नाती...आमची माती, आमची माणसं, हे शीर्षकगीत अनेकजण शेतात काम करताना गुणगुणतात; पण काळ्या आईच्या सेवेसाठी देहभान विसरून राबणारे मोजकेच! सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठे उपलब्ध करून देण्यासाठी शासन एका बाजूला प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली सिंचनाची पूर्वीची शाश्वत व्यवस्थाच गाडून टाकत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून आमची विहीर वाचवावी, अशी मागणी लोखंडे कुटुंबीयांनी केली आहे.