शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘काळ्या आई’साठी लाथाडले १३ लाख!

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

शेतकऱ्यांचा स्वाभिमान : रस्त्यात जाणारी ऐतिहासिक विहीर वाचविण्यासाठी वनवासवाडीच्या लोखंडे कुटुंबीयांची धडपड

सागर गुजर, सातारा : शेतात घाम न गाळता १३ लाखांचा चेक हातात पडत असताना काळ्या आईच्या सेवेसाठी आणि पूर्वजांची ऐतिहासिक विहीर वाचविण्यासाठी वनवासवाडीच्या कुटुंबाने तो नाकारला. चित्रपटाला शोभेल असे हे कथानक साताऱ्यात वास्तवात घडले. रोज हजारो लोकांची तहान भागविणारी महामार्गालगतची विहीर वाचावी, प्रशासनाने पैसे न देता, तिला कठडा बांधावा, अशी या शेतकरी कुटुंबाची मागणी आहे. जलयुक्त शिवार योजना राबवून हिरवाई फुलविण्याचे प्रयत्न शासन एका बाजूला करत असताना उपलब्ध पाण्याचे स्रोत मुजविण्याचा सपाटा सहापदरीकरणाच्या कामात सुरू आहे. जमीन संपादनाची नोटीस नाही....पैसे नाहीत अन् शेतावर बुलडोझर फिरविण्याचे काम सातारा शहरालगत सुरू असल्याने महामार्गालगतचे शेतकरी व्यथित आहेत. पणजोबांच्या काळातली पाण्याने तुडुंब भरलेली विहीर वाचावी, यासाठी वनवासवाडीच्या लोखंडे कुटुंबीयांनी मात्र प्रयत्नांची शिकस्त सुरू केलीय. सुनील लोखंडे, पांडुरंग लोखंडे, गणेश लोखंडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची बॉम्बे रेस्टॉरंटपासून हाकेच्या अंतरावर दहा एकर एकतळी शेती आहे. पाण्यासाठी महामार्गालगत दगडी बांधकाम असलेली फार पूर्वीची विहीर आहे. गेल्या पावसाळ््यात वरुणराजा रुसला तरीही या विहिरीत तुडुंब पाणीसाठा आहे. शेतात सध्या ऊस, भात पिके आहेत. पाटानं खळाळतं पाणी, गोठ्यात धष्टपुष्ट म्हशी, तसेच दोन बैल, मळणी मशीन यापेक्षा शेतकऱ्याकडं या विहिरीचं मोठं वैभव आहे. सहापदरीकरणाचे काम सुरू झाले अन् या वैभवाला नजर लागली. पांडुरंग लोखंडे आणि त्यांचे कुटुंबीय सांगत होते, ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन संपादनाची नोटीस दिली नाही की, या जमिनीचे पैसेही दिले नाहीत. जेसीबी आला अन् जमिनीत घुसला. काम थांबवायला गेलो तर आमच्यावरच आरेरावी सुरू झाली. शासकीय कामात अडथळा आणला, म्हणून पोलीस केस करू, असं धमकावलं जातंय! आमचा विकासाला विरोध नाही; पण रीतसर गोष्टी व्हायला हव्या होत्या. पूर्वजांनी बांधलेली विहीर वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.’ ही काळी आई...धन-धान्य देई! जोडते मनाची नाती...आमची माती, आमची माणसं, हे शीर्षकगीत अनेकजण शेतात काम करताना गुणगुणतात; पण काळ्या आईच्या सेवेसाठी देहभान विसरून राबणारे मोजकेच! सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठे उपलब्ध करून देण्यासाठी शासन एका बाजूला प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली सिंचनाची पूर्वीची शाश्वत व्यवस्थाच गाडून टाकत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून आमची विहीर वाचवावी, अशी मागणी लोखंडे कुटुंबीयांनी केली आहे.