शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

वाई तालुक्यात एका महिन्यात १२२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या ...

वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या आत येत आहे. कोरोनामुक्तांची संख्या साडेतीन हजारपार गेली असून कोरोनामुक्त होणारांची संख्या ३७३१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे.

वाई शहरासह तालुक्यातील १०३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. वाई तालुक्यातील अकरा गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. १ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात १२२ नवे रुग्ण सापडले. राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ग्राम सुरक्षा कमिटी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका यांनी काटेकोर नियोजन केले.

मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे योग्य नियोजन केले. याला गावातील जागृत नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. युरोप देशात आलेल्या नव्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे काळाची गरज आहे. तालुक्यात कोरोनाला पूर्ण पायबंद घालून साखळी तोडण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून फिरत्या पथकाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत. राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत वाई नगरपालिका व तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना सुरू आहे. यामुळे कोरोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी मदत होत आहे.

नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.

चौकट :

नियमांचे पालन करणे गरजेचे

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची घट झाली असून ही समाधानाची बाब आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. कोरोना आटोक्यात असला तरी प्रत्येकाने खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी केेले आहे.