शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात एका महिन्यात १२२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या ...

वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या आत येत आहे. कोरोनामुक्तांची संख्या साडेतीन हजारपार गेली असून कोरोनामुक्त होणारांची संख्या ३७३१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे.

वाई शहरासह तालुक्यातील १०३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. वाई तालुक्यातील अकरा गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. १ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात १२२ नवे रुग्ण सापडले. राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ग्राम सुरक्षा कमिटी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका यांनी काटेकोर नियोजन केले.

मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे योग्य नियोजन केले. याला गावातील जागृत नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. युरोप देशात आलेल्या नव्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे काळाची गरज आहे. तालुक्यात कोरोनाला पूर्ण पायबंद घालून साखळी तोडण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून फिरत्या पथकाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत. राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत वाई नगरपालिका व तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना सुरू आहे. यामुळे कोरोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी मदत होत आहे.

नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.

चौकट :

नियमांचे पालन करणे गरजेचे

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची घट झाली असून ही समाधानाची बाब आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. कोरोना आटोक्यात असला तरी प्रत्येकाने खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी केेले आहे.