शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

वाई तालुक्यात एका महिन्यात १२२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या ...

वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या आत येत आहे. कोरोनामुक्तांची संख्या साडेतीन हजारपार गेली असून कोरोनामुक्त होणारांची संख्या ३७३१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे.

वाई शहरासह तालुक्यातील १०३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. वाई तालुक्यातील अकरा गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. १ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात १२२ नवे रुग्ण सापडले. राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ग्राम सुरक्षा कमिटी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका यांनी काटेकोर नियोजन केले.

मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे योग्य नियोजन केले. याला गावातील जागृत नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. युरोप देशात आलेल्या नव्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे काळाची गरज आहे. तालुक्यात कोरोनाला पूर्ण पायबंद घालून साखळी तोडण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून फिरत्या पथकाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत. राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत वाई नगरपालिका व तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना सुरू आहे. यामुळे कोरोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी मदत होत आहे.

नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.

चौकट :

नियमांचे पालन करणे गरजेचे

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची घट झाली असून ही समाधानाची बाब आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. कोरोना आटोक्यात असला तरी प्रत्येकाने खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी केेले आहे.