शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

कोरेगाव तालुक्यात ४६८ जागांसाठी ११५८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

कोरेगाव : तालुक्यातील मिनी विधानसभा निवडणूक समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक ऐन ऐरणीवर आली आहे. ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक ...

कोरेगाव : तालुक्यातील मिनी विधानसभा निवडणूक समजली जाणारी ग्रामपंचायत

निवडणूक ऐन ऐरणीवर आली आहे. ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी तब्बल ११५८ उमेदवारी अर्ज रिंगणात उतरले

आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांची दोन ते तीन दिवस धावपळ सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर एक वर्षानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर

झाल्याने ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे. अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयासाठी लागणारी कागदपत्रे जुळवण्यापासून ते आरक्षित जागांवरील उमेदवारांच्या जातपडताळणीसाठी अनेकांनी दिवसरात्र एक केला. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये गावी अडकलेले शहरातील लोक ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. गावचा विकास व्हायचा असेल तर निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

राजकीय विरोधकांबरोबर चर्चेच्या फेऱ्या घडवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही गावांमध्ये यशस्वी झाला. अन्यत्र जोरदार लढती होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. अनेकांनी तर गावपातळीवरील प्रमुखांना पॅनल निवडीचे अधिकार बहाल केले आहेत. काही ठिकाणी पक्ष पातळीवर, तर काही ठिकाणी गावपातळीवर निवडणूक होत आहे, त्याला पक्षीय रंग चढलेला नाही. निवडणूक होत असलेल्या जागांपेक्षा जवळपास तिप्पट अर्ज दाखल झाल्याने इच्छुकांना थांबविण्यासाठी रणनीती आखली आहे. बैठकांचा सपाटा लावला आहे. दूरवरच्या पाहुण्यांपासून ते राजकीय पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांनी दूरध्वनी अथवा मोबाईलवरून संपर्क साधत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट :

आमने-सामने लढतीची शक्यता

तालुक्यात दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट लढत होणार असल्याचे

स्पष्ट झाले आहे. अनेक गावांमध्ये डमी अर्ज भरले आहेत. छाननीमध्ये केवळ ८ अर्ज अवैध ठरल्याने गाव पुढाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असून, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एकंदरीत तालुक्यात आमने-सामने थेट लढत होणार आहे, हे मात्र निश्‍चित आहे.