शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव तालुक्यात ४६८ जागांसाठी ११५८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

कोरेगाव : तालुक्यातील मिनी विधानसभा निवडणूक समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक ऐन ऐरणीवर आली आहे. ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक ...

कोरेगाव : तालुक्यातील मिनी विधानसभा निवडणूक समजली जाणारी ग्रामपंचायत

निवडणूक ऐन ऐरणीवर आली आहे. ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी तब्बल ११५८ उमेदवारी अर्ज रिंगणात उतरले

आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांची दोन ते तीन दिवस धावपळ सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर एक वर्षानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर

झाल्याने ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे. अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयासाठी लागणारी कागदपत्रे जुळवण्यापासून ते आरक्षित जागांवरील उमेदवारांच्या जातपडताळणीसाठी अनेकांनी दिवसरात्र एक केला. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये गावी अडकलेले शहरातील लोक ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. गावचा विकास व्हायचा असेल तर निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

राजकीय विरोधकांबरोबर चर्चेच्या फेऱ्या घडवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही गावांमध्ये यशस्वी झाला. अन्यत्र जोरदार लढती होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. अनेकांनी तर गावपातळीवरील प्रमुखांना पॅनल निवडीचे अधिकार बहाल केले आहेत. काही ठिकाणी पक्ष पातळीवर, तर काही ठिकाणी गावपातळीवर निवडणूक होत आहे, त्याला पक्षीय रंग चढलेला नाही. निवडणूक होत असलेल्या जागांपेक्षा जवळपास तिप्पट अर्ज दाखल झाल्याने इच्छुकांना थांबविण्यासाठी रणनीती आखली आहे. बैठकांचा सपाटा लावला आहे. दूरवरच्या पाहुण्यांपासून ते राजकीय पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांनी दूरध्वनी अथवा मोबाईलवरून संपर्क साधत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट :

आमने-सामने लढतीची शक्यता

तालुक्यात दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट लढत होणार असल्याचे

स्पष्ट झाले आहे. अनेक गावांमध्ये डमी अर्ज भरले आहेत. छाननीमध्ये केवळ ८ अर्ज अवैध ठरल्याने गाव पुढाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असून, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एकंदरीत तालुक्यात आमने-सामने थेट लढत होणार आहे, हे मात्र निश्‍चित आहे.